शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

विशेष अधिवेशनात 'या' ९ मुद्द्यांवर चर्चा करा; सोनिया गांधींचं PM नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:17 IST

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चा करण्यात आली.

नवी दिल्ली – मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा कुठलाही अजेंडा सरकारने जाहीर केला नाही. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सोनिया गांधींनी ९ मुद्दे उपस्थित केलेत. विशेष अधिवेशन बोलावण्याआधी कुठल्याही राजकीय पक्षांशी चर्चा केली नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे.

सोनिया गांधींनी पत्रात म्हटलंय की, या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही. ५ दिवसांसाठी हे अधिवेशन बोलावलंय. आम्हाला विशेष अधिवेशनात नक्कीच सहभागी व्हायचे आहे. कारण याठिकाणी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी मिळते. त्यामुळे योग्य नियमाअंतर्गत ९ मुद्द्यांवर चर्चेसाठी सरकारने वेळ द्यावा. सोनिया गांधींनी पत्रात आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांच्या मागण्या, अदाणी समुहाबाबत खुलासे, जातीय जणगणना, संघराज्यपद्धतीवर हल्ले यासह ९ मुद्द्यांवर चर्चेचा आग्रह धरला आहे.

सोनिया गांधींच्या पत्रातील ते ९ मुद्दे कोणते?

सध्याची आर्थिक स्थिती, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि बेरोजगारी वाढीबद्दल येणारे संकट

एमएसपी आणि शेतकरी यांच्यासाठी भारत सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने

अलीकडेच अदाणी समुहाबाबत झालेल्या व्यवहारांची चौकशी करण्याची जेपीसीची मागणी

मणिपूरमधील हिंसाचार, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, सामाजित असंतोषाची वाढ

हरियाणासारख्या अनेक राज्यात धार्मिक तणाव वाढत आहे

चीनचा भारतीय हद्दीतील जागांवर कब्जा, लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील सीमांमध्ये होणारी घुसखोरी

जातीय जनगणना होणे अत्यंत गरजेचे आहे.

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधामध्ये वाढणारा दुरावा, त्यातून होणारे नुकसान

काही राज्यात अतिवृष्टी तर काही राज्यात दुष्काळामुळे होणारा परिणाम

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. संसदेचे हे अधिवेशन का बोलावले याची माहिती कुणाकडे नाही. या अधिवेशनात सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडण्यात येणार असल्याचे बोलले जाते. त्यात एक देश, एक निवडणूक, महिला आरक्षण आणि इंडिया ऐवजी भारत शब्दाचा वापर करण्याबाबत विधेयक येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद