शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सोनिया व राहुलमुळेच झाले नाही कामकाज, संसदीय मंत्र्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:32 IST

संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली - संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते. अनंत कुमार यांनी राहुल व सोनिया गांधी यांनीच कामकाज चालू दिले नाही, असा आरोप करताच सोनिया यांनी आक्षेप घेतला.त्यांनी सभागृहाबाहेर अनंत कुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. सामान्यत: शांत राहणाऱ्या सोनिया गांधी यांनी संसदीय कामकाज मंत्री सभागृहात खोटे बोलू शकतात हे लाजिरवाणे आहे, अशा शब्दांत राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या, काँग्रेसचे सदस्य आपल्या जागेवर उभे राहून सभागृहात चर्चेची मागणी करीत होते. सरकार आणि त्याचे मित्र पक्ष कामकाज चालू देत नाहीत.सोनिया गांधी व अनंत कुमार यांच्यात चकमक सुरू असताना काँग्रेसचे सदस्य संतापून उभे ठाकले. वातावरण बिघडल्याचे पाहून सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची नावे कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले.भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडणे गरजेचे - पवारनवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडून देणे अत्यावश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आज कमकुवत असला तरी देशाला त्याची गरज आहे. त्याला टाळता येणार नाही. इतर राजकीय पक्षांना देशात ओळख नाही. ती काँग्रेसला आहे, असे पवार म्हणाले.प्रादेशिक पक्षांच्या शक्तीची जाणीव काँग्रेसनेही ठेवावी आणि त्यांच्याशी बोलणी करताना व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा, असे पवारांना वाटत आहे. काँग्रेसच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, समाजवादी पक्ष (सप), बहुजन समाज पक्ष (बसप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) या पक्षांशी सधन शेतकºयाकडील जमीन गेल्यानंतर जसे उद्धटपणे वागतात, तसे नव्हे, तर त्याच्याकडेही एके काळी जी शेती होती, याची आठवण ठेवून वागावे.उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वत:ची जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या संयुक्त उमेदवारांविरुद्ध आपला उमेदवार उभा केला होता.पवार यांनी मध्यंतरी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी व तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी एकत्र येण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून योजना कळवतो, असे त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते.

टॅग्स :ParliamentसंसदSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकार