पाटणा/इंदूर - इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात प्रमुख आरोपी असलेली त्यांची पत्नी सोनमला घटनास्थळी शिलाँगला नेले जात आहे. दरम्यान, राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी असा दावा केला की, सोनमने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी आणि प्रियकर राज कुशवाह याच्याशी विवाह करता यावा म्हणून पतीची हत्या केली.
हनीमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर राजा रघुवंशी याची हत्या झाली होती. भाडोत्री मारेकऱ्यांकरवी पत्नी सोनमनेच (२५) पतीचा काटा काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या दिवशी सोनमने व्रत ठेवले होते, त्याच दिवशी तिने डोळ्यासमोर पतीला संपविले. योजनेनुसार, राजाला धबधब्याच्या जवळ मारायचे होते. या दरम्यान, सुपारी किलर पायऱ्या चढून थकला होता, म्हणून तो मारण्यास नकार देत होता. तेव्हा सोनम त्याला ओरडून म्हणाली की, त्याला मारावे लागेल. मी तुला २० लाख रुपये देईन.
सोनमने इशारा केला आणि तिच्या डोळ्यादेखत...पोलिसांनुसार, सोनम व राजा रघुवंशी शिलाँगला पोहोचल्यानंतर मारेकऱ्यांनी सोनमच्या समोरच राजाची हत्या केली. मारेकऱ्यांना गुवाहाटीत बोलावून एक धारदार शस्त्र खरेदी करण्यात आले.
मंगळ दोष असा जात नाहीदरम्यान, मृत राजाच्या वडिलांनी मंगळ दोषाबाबत केलेल्या आरोपाबाबत स्थानिक ज्योतिषी धीरज दीक्षित यांनी सांगितले, की कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तो त्याचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूमुळे कमी होत नाही. सोनमने आरोपींसाठी तिकिटे बुक केली होती. काम झाले पाहिजे असे तिने ३ आरोपींना सांगितले होते.
तडफडून मुलगा गेला, मारेकऱ्यांना फाशी द्यामृत राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की ‘माझा मुलगा तडफडून गेला आहे.त्याच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. जेणेकरून यातून एक संदेश गेला पाहिजे आणि यानंतर अशा प्रकरणांत कोणत्याही माता-पित्याला आपला मुलगा गमवावा लागू नये.