शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुलाला हौतात्म, सून सारं काही घेऊन गेली, कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी मांडली व्यथा, केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:19 IST

Captain Anshuman Singh Family: गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते या कीर्तिचक्राचा स्वीकार अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि आईने केला होता. मात्र या सन्मानानंतर अंशुमन सिंह यांच्या  कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी हुतात्मा अंशुमन यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. आमच्या मुलाला हौतात्म्यं आलं. मात्र आता सारं काही सून घेऊन गेली, असा आरोप त्यांनी केली आहे.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आई मंजू देवी यांनी ५ जुलै रोजी कीर्ती चक्र सन्मानाचा स्वीकार केला होता. मात्र नंतर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेवर गंभीर आरोप केले.  ते म्हणाले की, आमच्या मुलाला वीरमरण आलं. मात्र आम्हाला काही मिळालं नाही. सन्मान आणि मदत म्हणून मिळालेली रक्कम सून घेऊन गेली. आमचा मुलगाही गेला आणि सूनही गेली.अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितले की, ‘नेक्ट टू किन’साठी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीची चर्चा केली आहे. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीवेळीही मी यामध्ये बदल करण्याविषयी बोललो होते. वीरमरण येण्यापूर्वी पाच महिने आधीच माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याला मुलबाळ नाही. त्यामुळे आज आमच्याकडे त्याच्या फोटोशिवाय काहीही उरलेलं नाही. दरम्यान, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी दावा केला की, त्यांची सून आता त्यांना सोडून गेली आहे. तसेच तिने आपला पत्ताही बदलला आहे. कीर्तिचक्र स्वीकारताना अंशुमनची आई सोबत होती. मात्र आता आमच्या मुलाच्या फोटोवर लावण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही आहे. आमच्यासोबत जे काही घडलंय, ते कुणासोबतही घडता कामा नये. मात्र हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांच्या पत्नीकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानFamilyपरिवार