शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मुलाला हौतात्म, सून सारं काही घेऊन गेली, कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी मांडली व्यथा, केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:19 IST

Captain Anshuman Singh Family: गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते या कीर्तिचक्राचा स्वीकार अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि आईने केला होता. मात्र या सन्मानानंतर अंशुमन सिंह यांच्या  कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी हुतात्मा अंशुमन यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. आमच्या मुलाला हौतात्म्यं आलं. मात्र आता सारं काही सून घेऊन गेली, असा आरोप त्यांनी केली आहे.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आई मंजू देवी यांनी ५ जुलै रोजी कीर्ती चक्र सन्मानाचा स्वीकार केला होता. मात्र नंतर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेवर गंभीर आरोप केले.  ते म्हणाले की, आमच्या मुलाला वीरमरण आलं. मात्र आम्हाला काही मिळालं नाही. सन्मान आणि मदत म्हणून मिळालेली रक्कम सून घेऊन गेली. आमचा मुलगाही गेला आणि सूनही गेली.अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितले की, ‘नेक्ट टू किन’साठी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीची चर्चा केली आहे. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीवेळीही मी यामध्ये बदल करण्याविषयी बोललो होते. वीरमरण येण्यापूर्वी पाच महिने आधीच माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याला मुलबाळ नाही. त्यामुळे आज आमच्याकडे त्याच्या फोटोशिवाय काहीही उरलेलं नाही. दरम्यान, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी दावा केला की, त्यांची सून आता त्यांना सोडून गेली आहे. तसेच तिने आपला पत्ताही बदलला आहे. कीर्तिचक्र स्वीकारताना अंशुमनची आई सोबत होती. मात्र आता आमच्या मुलाच्या फोटोवर लावण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही आहे. आमच्यासोबत जे काही घडलंय, ते कुणासोबतही घडता कामा नये. मात्र हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांच्या पत्नीकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानFamilyपरिवार