शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चेद्वारेच काढणार तोडगा, पंतप्रधान मोदी; खुल्या मनाने संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:41 IST

Narendra Modi News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेद्वारेच तोडगा काढण्याचा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीसांगितले.दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये भीषण हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तसेच संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी आयोजिलेल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत मोदी बोलत होते.या बैठकीच्या कामकाजाची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. नव्या कृषी कायद्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार अत्यंत खुल्या मनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. आमची याआधीही हीच भूमिका होती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हा हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. त्या घटनेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. संसदेतील अडथळ्यांमुळे छोट्या पक्षांची अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेमध्ये कामकाजात अडथळे आल्याने छोट्या पक्षांची विलक्षण अडचण होते. या पक्षांना त्यांचे विषय संसदेत मांडण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या पक्षांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालेल, यासाठी सहकार्य केले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण