शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
6
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भायनक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
7
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
8
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
9
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
10
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
11
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
12
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
13
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
14
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
15
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
16
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
17
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
18
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
19
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
20
वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावरून जंगी मिरवणूक अन् लोकांची प्रचंड गर्दी; सैनिक गावात पोहचताच झालं भव्य स्वागत

By प्रविण मरगळे | Updated: February 7, 2021 10:01 IST

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठीकरी गावात राहणारे निर्भय सिंह यांनी भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण केली

ठळक मुद्देनिवृत्त होऊन ते त्यांच्या मूळगावी परतले, त्यामुळे या सैनिकाच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केलीजवळपास गावातील लोक आणि नातेवाईक यांच्यासह अनेकांनी सैनिकाच्या स्वागतासाठी गर्दी केली होतीगोपी विहार कॉलनीपासून सार्थक नगर या परिसरात दीड किलोमीटर स्वागत यात्रा आणि डिजेसह मिरवणूक काढण्यात आली.

मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या सैनिकाचं जंगी स्वागत गावकऱ्यांनी केले. लोकांनी सैनिकाच्या स्वागतासाठी आपले तळहात जमिनीवर ठेवले, इतकचं नाही तर सैनिकाच्या गृहप्रवेशावेळी डीजे-ढोलताशा वाजवत नाचत गाजत सैनिकाला घोड्यावर बसवून संपूर्ण गावात जोरदार मिरवणूक काढण्यात आली.

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठीकरी गावात राहणारे निर्भय सिंह यांनी भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण केली, या सेवेनंतर निवृत्त होऊन ते त्यांच्या मूळगावी परतले, त्यामुळे या सैनिकाच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली, गावकऱ्यांनी त्यांचे तळहात जमिनीवर ठेवत त्यांचं स्वागत केले. लोकांनी केलेले हे अनोखं स्वागत पाहून निवृत्त सैनिकही भारावले.

जवळपास गावातील लोक आणि नातेवाईक यांच्यासह अनेकांनी सैनिकाच्या स्वागतासाठी गर्दी केली होती, गोपी विहार कॉलनीपासून सार्थक नगर या परिसरात दीड किलोमीटर स्वागत यात्रा आणि डिजेसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक निर्भय सिंह घोड्यावर बसले होते, लोक डिजेवर देशभक्तीच्या गाणं वाजवून नाचण्यात दंग झाले होते, एका हातात तिरंगा फडकवण्यात येत होता. सैनिक घराजवळ पोहचल्यानंतर प्रत्येकाने तळहात जमिनीवर टेकवत त्यांना अभिवादन केले.

याबाबत बोलताना हेड कॉस्टेंबल निर्भय सिंह म्हणाले की, याप्रकारे माझं स्वागत करण्यात येईल याची जराही कल्पना नव्हती, लोकांनी हात पसरवत मला घरापर्यत सोडलं, ही माझ्यासाठी सर्वात मोठी सन्मानाची बाब आहे, मी लोकांचा कायम ऋणी आहे. ज्याप्रकारे लोकांनी माझं स्वागत केले ते पाहून खूप आनंद वाटला, मी वयाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे, जर मला संधी मिळाली तर मी समाजसेवा नक्की करेन, मनात कायम देशसेवा राहिल, त्याप्रमाणे समाजसेवा करेन, मला संधी मिळावी आणि समाजसेवा करावी हीच माझी इच्छा असल्याचं निर्भय सिंह म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndian Armyभारतीय जवान