शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

... तर तुमच्या आश्रमात सेवा करू, अनिसनंतर बागेश्वर बाबांना आता जादूगरांचं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 16:23 IST

बागेश्वर बाबा मनातलं ओळख असल्यामुळे बालाजी प्रसन्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच अंधश्रद्दा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिल होते. आता, एका जादुगारानेही बागेश्वर बाबांना आव्हान दिलं आहे.

बागेश्वर बाबा मनातलं ओळख असल्यामुळे बालाजी प्रसन्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, मनातलं ओळखणं ही एक कला असून 'माईंड रीडर' सुहानी शाह देखील चर्चेत आली आहे. त्यानंतर, आता देशातील प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांनी धीरेंद्र शर्मा यांना आव्हान दिलं आहे. जगात कुठेही दिव्यशक्ती नसून जादू हीच एक विद्या असल्याचं त्यांनी म्हटलं. जादू ही अलौकीक किंवा चमत्कार नसून ते विज्ञान कलेचं रुप आहे. आम्ही ज्या पद्धतीने ते दाखवून देतो, त्यातून ही जादू असल्याचा भास समोरच्या व्यक्तींना होतो, असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.

मेडिटेशन, योगा आणि बहुरंगी कलांचा समावेश जादूच्या कलेत आहे. मिक्स आर्ट किंवा जादू असंही या कलेला म्हटलं जातं. अलवर येथे जादूचा शो करत असताना शिव कुमार यांनी बागेश्वर धामच्या महाराजांना आव्हानच दिलं आहे. जादूगरांसमोर तुमची दिव्य शक्ती किंवा अलौकिक शक्ती दाखवा, सिद्ध करा. तसे केल्यास सर्वच जादूगार तुमच्या आश्रमात सेवा देतील, असे चॅलेंज जादूगार शिव कुमार यांनी बागेश्वर बाबांना केलं आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वच जादूगरांना २८ जानेवारी रोजी त्यांनी अलवर येथे बोलावले आहे.  

दरम्यान, सनातन धर्मात देव आहे, आणि देव असायला पाहिजे. मात्र, देवाच्या नावाने चमत्कार ही अंधश्रद्धा आहे, असेही जादूगार शिव कुमार यांनी म्हटले.

माईंड रिडर सुहानीने करुन दाखवलं 

सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामSocial Viralसोशल व्हायरलshyam manavश्याम मानव