शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

... म्हणून टक्केवारी घोषित करायला उशीर, दिल्ली विधानसभेसाठी 62.59 % मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:54 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील

नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी नेमकं किती टक्के मतदान झालं, हे लवकर समजलंच नाही. कारण, निवडणूक आयोगाने आकडेवारीच जाहीर केली नव्हती. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने रविवारी उशिरा दिल्लीतील विधानसभा निवडणुकातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. तर, केजरीवाल यांच्याकडून केलेल्या कामाला जनतेसमोर ठेवत प्रचार सुरू होता. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरली. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.

विधानसभेच्या मतदानानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. अखेर, निवडणूक आयोगाने कामाचा ताण, आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यस्ततेमुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशिर झाल्याचे सांगितले. तसेच, दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेला दिल्लीत 67.1 टक्के मतदान झाले होते. बल्लीमरान येथे सर्वाधिक 71.6 टक्के मतदान झाले असून दिल्ली कँट येथे सर्वात कमी म्हणजेच 45.4 टक्के मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मतदानच्या अंतिम टक्केवारीची एक प्रक्रिया असते. मतदान प्रकियेनंतर जेव्हा डेटा येतो, तेव्हा तो सर्वत्र जोडला जातो. त्यानंतरच, डेटा शेअर करण्यात येतो. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून उशि झाल्याचं आयोगाने स्पष्टीकरण दिलंय.  

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालVotingमतदानdelhi electionदिल्ली निवडणूक