शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू

By admin | Updated: November 16, 2016 18:09 IST

500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्येच अनेकांचा जीव जातो आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - 500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्येच अनेकांचा जीव जातो आहे. आतापर्यंत नोटबंदीच्या निर्णयामुळे 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. त्यातील अनेकांनी या निर्णयानंतर आत्महत्येचा मार्ग पत्करलाय. तर काहींना निर्णयाचा धक्का बसल्यानं मृत्यू झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानं धक्का बसलेल्यांचं मृत्यूसत्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज दिवसभरात पिंपरीतील राजगुरूनगरमध्ये एसबीआय बँकेच्या शाखेतील एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तर भाईंदरमध्ये नोटा बदलण्याच्या रांगेत दीपक शाह या वृद्ध इसमाचा मृत्यू ओढावला आहे. तर सोलापुरातही स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या सात दिवसांत जवळपास 35 लोकांचा मृत्यू ओढावला आहे. याआधी उत्तर प्रदेशमध्ये ५५ वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली आहे. नोटाबंदीमुळे मुलीच्या लग्नासाठी बँकेतून पैसे काढता येत नसल्याने देवराज सिंह यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तर नांदेडमध्ये बँकेच्या रांगेत असताना एका वृद्धाचा मृत्यू झाला. आठ दिवसानंतरही बँकेसमोरील गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. रांगेत सकाळी लवकर येऊन उभे राहिलेल्या नागरिकांचा दुपारपर्यंत नंबर येत नसल्याची तक्रार असून, बँक कर्मचारीही ग्राहकांशी योग्यरीतीनं वागत नाहीत. त्यामुळे अनेकदा वादाला निमंत्रण मिळत आहे. घरी लग्नसमारंभ असलेल्यांची मोठी अडचण होत असतानाच पैशांअभावी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.