शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आतापर्यंत ३ समिती बनल्या, 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यात काय आहेत अडथळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:15 IST

स्वातंत्र्य भारतात एक देश एक निवडणूक आधीपासूनच सुरु होते. आधीच्या सरकारमध्येही ही चर्चा होती. परंतु काही रिपोर्टनंतर पुढे काहीच झाले नाही.

नवी दिल्ली – केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक या महत्त्वाच्या योजनेवर एक पाऊल पुढे केले आहे. शुक्रवारी वन नेशन, वन इलेक्शन यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही समिती एक देश, एक निवडणूक यावर काम करेल. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.

१९६७ पर्यंत होत्या एकच निवडणुका

स्वातंत्र्य भारतात एक देश एक निवडणूक आधीपासूनच सुरु होते. आधीच्या सरकारमध्येही ही चर्चा होती. परंतु काही रिपोर्टनंतर पुढे काहीच झाले नाही. भारतात १९६७ सालापर्यंत एकत्र निवडणूक घेण्याची प्रथा होती. परंतु १९६८ आणि १९६९ या काळात काही विधानसभा आणि डिसेंबर १९७० यात संसद भंग झाल्यानंतर वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत. परंतु पुन्हा एकत्र निवडणूक घेण्यासाठी १९८३ मध्ये निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये मुद्दा समोर आला होता. त्यानंतर ३ अन्य रिपोर्टमध्येही याबाबत अभ्यास केला गेला होता.

विधी आयोग रिपोर्ट(१९९९)

न्यायाधीश बी.पी जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाने मे १९९९ मध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, प्रत्येक वर्षी होणाऱ्या निवडणुकीचे चक्र बंद व्हायला हवे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा विचार व्हावा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दर ५ वर्षांनी घ्याव्यात.

संसदीय स्थायी समिती रिपोर्ट(२०१५)

२०१५ मध्ये डॉ. ई एम सुदर्शन नचियप्पन यांच्या अध्यक्षतेखाली लोकतक्रार, कायदा आणि न्यायासाठी संसदीय स्थायी समिती बनवली गेली. १७ डिसेंबर २०१५ रोजी लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका एकत्र करण्यात येणारे अडथळे अभ्यासातून यामध्ये समोर आणले.

एकत्र निवडणूक घेण्यास काय आहेत अडथळे?

विविध निवडणुकांसाठी कार्यक्रमासाठी सध्याच्या काळात होणारा मोठा खर्च

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर एकप्रकारे नीती धोरण लागू करण्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आवश्यक सुविधांचा बोजवारा उडेल

निवडणूक काळात तैनात करण्यात येणारं मनुष्यबळ वाढेल.

३० ऑगस्ट २०१८ रोजी एकत्र निवडणूक घेण्याबाबत विधी आयोगाचे अध्यक्ष न्या. बीएस चौहान यांनी रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये कायदा आणि संविधानाचे मुद्दे समोर आणले. त्यात संविधानाच्या मूळ रचनेतंर्गत एकत्रित निवडणूक घेतल्या जाऊ शकत नाही. संविधान, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, लोकसभा आणि राज्यातील विधानसभा यांच्या प्रक्रियेतील नियमात दुरुस्ती करूनच एकत्रित निवडणूक घेता येऊ शकतात. कमीत कमी ५० टक्क्याहून अधिक राज्यात संविधानात दुरुस्ती करावी लागेल. एकत्रित निवडणूक केल्याने सार्वजनिक पैशांची बचत होईल. सुरक्षा दल, प्रशासनावरील ओझं हलकं होईल. सरकारी धोरण अवलंबण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. प्रशासन निवडणुकांऐवजी विकास कामांच्या धोरणावर अधिक लक्ष करू शकते.

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनCentral Governmentकेंद्र सरकारElectionनिवडणूक