शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:31 IST

Arvind Kejriwal News: विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली सरकारमधील मंत्री सांगितले की, यापूर्वी विधानसभा भंग करून आम आदमी पक्षाने एकदा चुक केली आहे. जर यावेळीही असं काही केलं असतं तर आम्ही सरकारपासून पळ काढत आहोत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला असता. त्यामुळे आम आदमी पक्षाने विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतलेला नाही.  आम्ही सरकारपासून पळ काढलेला नाही. केजरीवाल आपल्या मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीचा त्याग करत आहेत. जर जनतेने सांगितलं की आमचा मुलगा ईमानदार आहे, तर ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीवर बसतील, अन्यथा आपल्या घरी निघून जातील, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.

 तसेच राजीनामा द्यायचा होता तर राज्यापालांकडे द्यायला हवा होता. विधानसभा भंग करून निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, असा प्रश्न विचारला असता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, कार रविवार होता आणि आज ईद आहे. उद्या आठवड्यातील पहिला सोमवार आहे, केजरीवाल उद्या राजीनामा देतील. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.  

दरम्यान, ४८ तासांमध्ये काही तरी लपवलं जात आहे. काही फाईल्स क्लिअर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुम्ही विचार करा. कुठल्याही फाइलवर सही झाली तर ती गोपनीय राहणार नाही. सही झाल्यावर ती फाईल नायब राज्यपालांकडे जाईल. आणि सर्वांना समजेल. त्यामुळे ४८ तासांमध्ये काहीही होणार नाही. दोन वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. त्यांनी एवढा पैसा कमावला, आमच्याकडे पुरावे आहेत, असे दावे केले गेले. तपास यंत्रणांच्या तपासाला दोन वर्षे होत आली. जर यांच्याकडे एवढेच पुरावे होते. तर २ वर्षांनंतरही ट्रायल सुरू का केली नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली