शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:31 IST

Arvind Kejriwal News: विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली सरकारमधील मंत्री सांगितले की, यापूर्वी विधानसभा भंग करून आम आदमी पक्षाने एकदा चुक केली आहे. जर यावेळीही असं काही केलं असतं तर आम्ही सरकारपासून पळ काढत आहोत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला असता. त्यामुळे आम आदमी पक्षाने विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतलेला नाही.  आम्ही सरकारपासून पळ काढलेला नाही. केजरीवाल आपल्या मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीचा त्याग करत आहेत. जर जनतेने सांगितलं की आमचा मुलगा ईमानदार आहे, तर ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीवर बसतील, अन्यथा आपल्या घरी निघून जातील, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.

 तसेच राजीनामा द्यायचा होता तर राज्यापालांकडे द्यायला हवा होता. विधानसभा भंग करून निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, असा प्रश्न विचारला असता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, कार रविवार होता आणि आज ईद आहे. उद्या आठवड्यातील पहिला सोमवार आहे, केजरीवाल उद्या राजीनामा देतील. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.  

दरम्यान, ४८ तासांमध्ये काही तरी लपवलं जात आहे. काही फाईल्स क्लिअर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुम्ही विचार करा. कुठल्याही फाइलवर सही झाली तर ती गोपनीय राहणार नाही. सही झाल्यावर ती फाईल नायब राज्यपालांकडे जाईल. आणि सर्वांना समजेल. त्यामुळे ४८ तासांमध्ये काहीही होणार नाही. दोन वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. त्यांनी एवढा पैसा कमावला, आमच्याकडे पुरावे आहेत, असे दावे केले गेले. तपास यंत्रणांच्या तपासाला दोन वर्षे होत आली. जर यांच्याकडे एवढेच पुरावे होते. तर २ वर्षांनंतरही ट्रायल सुरू का केली नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली