शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:31 IST

Arvind Kejriwal News: विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली सरकारमधील मंत्री सांगितले की, यापूर्वी विधानसभा भंग करून आम आदमी पक्षाने एकदा चुक केली आहे. जर यावेळीही असं काही केलं असतं तर आम्ही सरकारपासून पळ काढत आहोत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला असता. त्यामुळे आम आदमी पक्षाने विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतलेला नाही.  आम्ही सरकारपासून पळ काढलेला नाही. केजरीवाल आपल्या मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीचा त्याग करत आहेत. जर जनतेने सांगितलं की आमचा मुलगा ईमानदार आहे, तर ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीवर बसतील, अन्यथा आपल्या घरी निघून जातील, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.

 तसेच राजीनामा द्यायचा होता तर राज्यापालांकडे द्यायला हवा होता. विधानसभा भंग करून निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, असा प्रश्न विचारला असता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, कार रविवार होता आणि आज ईद आहे. उद्या आठवड्यातील पहिला सोमवार आहे, केजरीवाल उद्या राजीनामा देतील. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.  

दरम्यान, ४८ तासांमध्ये काही तरी लपवलं जात आहे. काही फाईल्स क्लिअर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुम्ही विचार करा. कुठल्याही फाइलवर सही झाली तर ती गोपनीय राहणार नाही. सही झाल्यावर ती फाईल नायब राज्यपालांकडे जाईल. आणि सर्वांना समजेल. त्यामुळे ४८ तासांमध्ये काहीही होणार नाही. दोन वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. त्यांनी एवढा पैसा कमावला, आमच्याकडे पुरावे आहेत, असे दावे केले गेले. तपास यंत्रणांच्या तपासाला दोन वर्षे होत आली. जर यांच्याकडे एवढेच पुरावे होते. तर २ वर्षांनंतरही ट्रायल सुरू का केली नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली