शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून २५ कोटी लाेक गरिबीतून आले बाहेर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 07:25 IST

विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेली पारदर्शक व्यवस्था, तिचे प्रामाणिक प्रयत्न आणि लोकसहभागावर दिलेला भर यामुळे गेल्या ९ वर्षांत जवळपास २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधताना केले. 

“भारतातील गरिबी कमी होऊ शकते याचा कोणीही विचार केला नसेल, परंतु गरिबांनी दाखवून दिले आहे की, त्यांना संसाधने दिली तर ते होऊ शकते, असेही ते म्हणाले. देशात गरिबीची संख्या २५ काेटींनी घटल्याचा नीती आयोगाने अहवाल नुकताच सादर केला हाेता. त्या अहवालाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले की, भारताने गरिबांना मदत करण्यासाठी इतर देशांसमोर एक मॉडेल सादर करून जागाचे लक्ष वेधले आहे. हा अतिशय उत्साहवर्धक अहवाल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यावेळी म्हणाले.

‘विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनलाविकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले.ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. लोकांचा आत्मविश्वास, सरकारवरील विश्वास आणि नवीन भारत घडवण्याचा संकल्प सर्वत्र दिसत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

यात्रेचे यशयात्रेदरम्यान ४ कोटींहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.५० कोटींहून अधिक लोकांना ‘आयुष्मान’ कार्ड देण्यात आले. जवळपास ३५ लाख शेतकऱ्यांचा ‘पीएम किसान योजनेत समावेश करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांत ४ कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले आहे आणि त्यातील ७० टक्के मालकी महिलांकडे आहेत. यामुळे त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी