शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

म्हणून 16 जूनला भारत आणि चीनमधील विवाद भडकला

By admin | Updated: June 30, 2017 21:37 IST

सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 -  सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. हा संपूर्ण विवाद डोकलाम येथील पठारी भागावरील हक्कासंदर्भात आहे. हा भाग भूतानचा असून, चिनी त्याच्यावर आपला हक्क सांगत असतात.  दरम्यान, 16 जूनला चीन आणि भूतानच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्यानंतर  भारतीय सैनिक भूतानी सैनिकांना मदत करण्यासाठी तेथे पोहोचले. मात्र तोपर्यंत चीनी सैनिक तेथून माघारी गेले होते.
डोकलामबाबत भूतान आणि चीन यांच्यात 1984 पासून विवाद सुरू आहे. दोन्ही देशात या प्रश्नी चर्चेच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत हा विवाद सुटू शकलेला नाही.  चिनी सैनिक या भागात गस्त देण्यासाठी येत असतात, मात्र ते माघारीही जातात.  दरम्यान 16 जूनला चीनी सैनिक बांधकाम करणाऱ्या पथकासह मशीन आणि वाहने घेऊन या भागात घुसले.  चीनी सैन्याकडून अशी हालचाल याआधी कधीही दिसली नव्हती. त्यांनी रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यावर भूतानच्या सैनिकांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. तसेच त्यांचे हे एकतर्फी पाऊल 1988 आणि 1998च्या कराराचे उल्लंघन असेल, असेही चीनी सैन्याला बजावण्यात आले. 
चीनी सैनिक जो रस्ता बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि भूतानची चिंता वाढवणारा आहे. कारण या परिसरापासून भारताला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर केवळ काही किलोमीटर अंतरावर आहे.