शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून 16 जूनला भारत आणि चीनमधील विवाद भडकला

By admin | Updated: June 30, 2017 21:37 IST

सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 -  सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. हा संपूर्ण विवाद डोकलाम येथील पठारी भागावरील हक्कासंदर्भात आहे. हा भाग भूतानचा असून, चिनी त्याच्यावर आपला हक्क सांगत असतात.  दरम्यान, 16 जूनला चीन आणि भूतानच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्यानंतर  भारतीय सैनिक भूतानी सैनिकांना मदत करण्यासाठी तेथे पोहोचले. मात्र तोपर्यंत चीनी सैनिक तेथून माघारी गेले होते.
डोकलामबाबत भूतान आणि चीन यांच्यात 1984 पासून विवाद सुरू आहे. दोन्ही देशात या प्रश्नी चर्चेच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत हा विवाद सुटू शकलेला नाही.  चिनी सैनिक या भागात गस्त देण्यासाठी येत असतात, मात्र ते माघारीही जातात.  दरम्यान 16 जूनला चीनी सैनिक बांधकाम करणाऱ्या पथकासह मशीन आणि वाहने घेऊन या भागात घुसले.  चीनी सैन्याकडून अशी हालचाल याआधी कधीही दिसली नव्हती. त्यांनी रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यावर भूतानच्या सैनिकांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. तसेच त्यांचे हे एकतर्फी पाऊल 1988 आणि 1998च्या कराराचे उल्लंघन असेल, असेही चीनी सैन्याला बजावण्यात आले. 
चीनी सैनिक जो रस्ता बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि भूतानची चिंता वाढवणारा आहे. कारण या परिसरापासून भारताला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर केवळ काही किलोमीटर अंतरावर आहे.