शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

म्हणून 16 जूनला भारत आणि चीनमधील विवाद भडकला

By admin | Updated: June 30, 2017 21:37 IST

सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 -  सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. हा संपूर्ण विवाद डोकलाम येथील पठारी भागावरील हक्कासंदर्भात आहे. हा भाग भूतानचा असून, चिनी त्याच्यावर आपला हक्क सांगत असतात.  दरम्यान, 16 जूनला चीन आणि भूतानच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्यानंतर  भारतीय सैनिक भूतानी सैनिकांना मदत करण्यासाठी तेथे पोहोचले. मात्र तोपर्यंत चीनी सैनिक तेथून माघारी गेले होते.
डोकलामबाबत भूतान आणि चीन यांच्यात 1984 पासून विवाद सुरू आहे. दोन्ही देशात या प्रश्नी चर्चेच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत हा विवाद सुटू शकलेला नाही.  चिनी सैनिक या भागात गस्त देण्यासाठी येत असतात, मात्र ते माघारीही जातात.  दरम्यान 16 जूनला चीनी सैनिक बांधकाम करणाऱ्या पथकासह मशीन आणि वाहने घेऊन या भागात घुसले.  चीनी सैन्याकडून अशी हालचाल याआधी कधीही दिसली नव्हती. त्यांनी रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यावर भूतानच्या सैनिकांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. तसेच त्यांचे हे एकतर्फी पाऊल 1988 आणि 1998च्या कराराचे उल्लंघन असेल, असेही चीनी सैन्याला बजावण्यात आले. 
चीनी सैनिक जो रस्ता बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि भूतानची चिंता वाढवणारा आहे. कारण या परिसरापासून भारताला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर केवळ काही किलोमीटर अंतरावर आहे.