शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 18:57 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत जोहरने 91 टक्के गुण मिळविले आहे. याबाबत स्मृती इराणी यांनी ट्विटकरुन आपला आनंद व्यक्त केला आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद सगळ्यांशी शेअर करत म्हटले आहे, 'माझा मुलगा जोहर याचा मला अभिमान आहे. वर्ल्ड केम्पो चॅम्पियनशिपमध्ये त्याला ब्राँझ मेडल तर मिळालेच शिवाय बारावीच्या परीक्षेतही त्याने कमाल करून दाखवली. चार विषयात 91 टक्के मिळाले आहेत. खास करून अर्थशास्त्रामध्येही त्याला 94 टक्के गुण मिळाले.' 

याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुल्कीत केजरीवाल यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुल्कीत केजरीवाल याला बारावीच्या परिक्षेत 96.4 टक्के मिळाल्याचे ट्विट केले आहे. 

देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. या परीक्षेत हंसिका शुक्ला या विद्यार्थिनींने पहिला क्रमांक पटकावला आहे. हंसिकाबरोबरच करिश्मा अरोरा ही विद्यार्थिनीही परीक्षेत टॉपर ठरली आहे. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. 

यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले. 

(५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?)

सीबीएसईचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांना नव्हती. सीबीएसईचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अचानक आज दुपारी आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी सीबीएसईचे निकाल विविध टप्प्यांमध्ये जाहीर व्हायचे. मात्र यंदा सर्व विभागांचे निकाल सीबीएसईकडून एकाचवेळी जाहीर करण्यात आले. जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीCBSE Examसीबीएसई परीक्षा