शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चक्रीवादळांचा धुमाकूळ! ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीला तडाखे; अनेकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:28 IST

मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ ताशी १४५ कि.मी. वेगाने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राच्या किनाऱ्यांवर धडकले आहे. मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. जगातील सुमारे आठ टक्के उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा भारताला धोका आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या विविध भागांमध्ये अनेक प्राणघातक चक्रीवादळांचा परिणाम झाला आहे.

चक्रीवादळ 'बिपाेरजॉय' गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले असून, यात प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्छमध्ये विजेचा टॉवर कोसळला असून, अनेक ठिकाणी मंदिरांचेही नुकसान झाले.

‘एचएएम’ रेडिओ टीम तैनात

‘बिपोरजॉय’ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने ‘एचएमए’ रेडिओची टीम तैनात केली.

टौटे

  • १७ मे २०२१ रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘टौटे’ दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
  • १००+मृत्यू

हुदहुद

  • १२ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले.
  • १२४मृत्यू

अम्फान

  • ओडिशामधील १९९९ च्या सुपर चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात धडकणारे पहिले सुपर चक्रीवादळ अम्फान २० मे २०२० रोजी पश्चिम बंगालमधील सुंदरबनजवळ धडकले. भारत, बांगलादेशमध्ये सुमारे १४ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले.
  • १२९ मृत्यू

फायलिन

  • १२ ऑक्टोबर २०१३ ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर जवळील किनारपट्टीला फायलिन धडकले. २०० किमी प्रतितास वेगाने वारे. राज्यातील १.३२ कोटी लोकांना फटका. 
  • ४४मृत्यू

फानी

  • ३ मे २०१९ रोजी हे वादळ ओडिशातील पुरीजवळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला १७५ किमी प्रतितास वेगाने धडकले.
  • ६४मृत्यू

वरदा

  • १२ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईजवळ धडकले. त्यात तमिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
  • १८ मृत्यू

‘भोला’ने केले पाकचे दोन तुकडे

  • १२ नोव्हेंबर १९७० रोजी पूर्व पाकच्या किनारपट्टीवर ‘भोला’ चक्रीवादळ आले. त्यातील विध्वंसामुळे गृहयुद्ध झाले. त्यातून बांगलादेशचा जन्म झाला.
  • या चक्रीवादळामुळे ३००००० ते ५००००० लोकांचा मृत्यू झाला.
टॅग्स :cycloneचक्रीवादळ