शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चक्रीवादळांचा धुमाकूळ! ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीला तडाखे; अनेकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:28 IST

मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ ताशी १४५ कि.मी. वेगाने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राच्या किनाऱ्यांवर धडकले आहे. मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. जगातील सुमारे आठ टक्के उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा भारताला धोका आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या विविध भागांमध्ये अनेक प्राणघातक चक्रीवादळांचा परिणाम झाला आहे.

चक्रीवादळ 'बिपाेरजॉय' गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले असून, यात प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्छमध्ये विजेचा टॉवर कोसळला असून, अनेक ठिकाणी मंदिरांचेही नुकसान झाले.

‘एचएएम’ रेडिओ टीम तैनात

‘बिपोरजॉय’ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने ‘एचएमए’ रेडिओची टीम तैनात केली.

टौटे

  • १७ मे २०२१ रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘टौटे’ दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
  • १००+मृत्यू

हुदहुद

  • १२ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले.
  • १२४मृत्यू

अम्फान

  • ओडिशामधील १९९९ च्या सुपर चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात धडकणारे पहिले सुपर चक्रीवादळ अम्फान २० मे २०२० रोजी पश्चिम बंगालमधील सुंदरबनजवळ धडकले. भारत, बांगलादेशमध्ये सुमारे १४ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले.
  • १२९ मृत्यू

फायलिन

  • १२ ऑक्टोबर २०१३ ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर जवळील किनारपट्टीला फायलिन धडकले. २०० किमी प्रतितास वेगाने वारे. राज्यातील १.३२ कोटी लोकांना फटका. 
  • ४४मृत्यू

फानी

  • ३ मे २०१९ रोजी हे वादळ ओडिशातील पुरीजवळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला १७५ किमी प्रतितास वेगाने धडकले.
  • ६४मृत्यू

वरदा

  • १२ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईजवळ धडकले. त्यात तमिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
  • १८ मृत्यू

‘भोला’ने केले पाकचे दोन तुकडे

  • १२ नोव्हेंबर १९७० रोजी पूर्व पाकच्या किनारपट्टीवर ‘भोला’ चक्रीवादळ आले. त्यातील विध्वंसामुळे गृहयुद्ध झाले. त्यातून बांगलादेशचा जन्म झाला.
  • या चक्रीवादळामुळे ३००००० ते ५००००० लोकांचा मृत्यू झाला.
टॅग्स :cycloneचक्रीवादळ