शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळांचा धुमाकूळ! ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीला तडाखे; अनेकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:28 IST

मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ ताशी १४५ कि.मी. वेगाने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राच्या किनाऱ्यांवर धडकले आहे. मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. जगातील सुमारे आठ टक्के उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा भारताला धोका आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या विविध भागांमध्ये अनेक प्राणघातक चक्रीवादळांचा परिणाम झाला आहे.

चक्रीवादळ 'बिपाेरजॉय' गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले असून, यात प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्छमध्ये विजेचा टॉवर कोसळला असून, अनेक ठिकाणी मंदिरांचेही नुकसान झाले.

‘एचएएम’ रेडिओ टीम तैनात

‘बिपोरजॉय’ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने ‘एचएमए’ रेडिओची टीम तैनात केली.

टौटे

  • १७ मे २०२१ रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘टौटे’ दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
  • १००+मृत्यू

हुदहुद

  • १२ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले.
  • १२४मृत्यू

अम्फान

  • ओडिशामधील १९९९ च्या सुपर चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात धडकणारे पहिले सुपर चक्रीवादळ अम्फान २० मे २०२० रोजी पश्चिम बंगालमधील सुंदरबनजवळ धडकले. भारत, बांगलादेशमध्ये सुमारे १४ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले.
  • १२९ मृत्यू

फायलिन

  • १२ ऑक्टोबर २०१३ ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर जवळील किनारपट्टीला फायलिन धडकले. २०० किमी प्रतितास वेगाने वारे. राज्यातील १.३२ कोटी लोकांना फटका. 
  • ४४मृत्यू

फानी

  • ३ मे २०१९ रोजी हे वादळ ओडिशातील पुरीजवळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला १७५ किमी प्रतितास वेगाने धडकले.
  • ६४मृत्यू

वरदा

  • १२ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईजवळ धडकले. त्यात तमिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
  • १८ मृत्यू

‘भोला’ने केले पाकचे दोन तुकडे

  • १२ नोव्हेंबर १९७० रोजी पूर्व पाकच्या किनारपट्टीवर ‘भोला’ चक्रीवादळ आले. त्यातील विध्वंसामुळे गृहयुद्ध झाले. त्यातून बांगलादेशचा जन्म झाला.
  • या चक्रीवादळामुळे ३००००० ते ५००००० लोकांचा मृत्यू झाला.
टॅग्स :cycloneचक्रीवादळ