शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले.

सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले.
सोलापूर महानगरपालिका व प्लास्ट इंडिया फाउंडेशन, मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत महापौर प्रा. सुशीला आबुटे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेविका गीता मामड्याल, नगरसेवक चेतन नरोटे, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी प्लास्टिक वापर, पुनर्वापर नियंत्रण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बोलताना महापौर प्रा. सुशीला आबुटे म्हणाल्या की, टापटिपपणा, नीटनेटकेपणा व सुटसुटीतपणा, स्वच्छता आरोग्य म्हणजेच स्मार्ट सिटी होय. जे आहे ते चांगले ठेवले पाहिजे, असे आबुटे म्हणाल्या.
यावेळी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील म्हणाले की, स्मार्ट सिटी व स्वच्छ सोलापूरकरिता चार गटांद्वारे अभियान राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील फेरीवाले गट, व्यापार्‍यांचा गट, नागरिकांचा गट, अन्य गट यांना आवाहन करण्यात आले आहे. फेरीवाल्यांनी आपला कचरा रस्त्यावर न टाकता आपल्याजवळ साठवून तो कचराकुंडीत टाकावा. व्यापार्‍यांनी आपले दुकान झाडल्यानंतर तो कचरा फुटपाथवर अथवा रस्त्यावर लोटून देऊ नये, डसबीनमध्ये ठेवावा, घंटागाडी आल्यानंतर घेऊन जाईल. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक अतिशय धोकादायक असून, वापरू नये. केंद्राच्या 10 स्मार्ट सिटी यादीत सोलापूरचा निश्चित समावेश असेल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका निर्मला जाधव, विजया वड्डेपल्ली, कुमुद अंकाराम, बाबा मिस्त्री, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगरसचिव ए.ए. पठाण, जितेंद्र जोशी, काशिनाथ भतगुणकी, राजू राठी, केतनभाई शहा, गीता पाटोळे, एन.जी.ओ. संस्था, प्रशालेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, व्यापारी मंडळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)
चौकट..
पर्यावरणात पंचमहाभूतांची संकल्पना : अंधारे
पंचमहाभूतांची संकल्पना पर्यावरणात आहे. प्रदूषण दूर झाल्यावरच व स्वच्छ भारत झाल्यावरच हेल्दी इंडिया होईल. सध्या अपटेकवर जग उड्या मारत आहे. प्लास्टिक हे पेट्रोकेमिकलपासून बनते. ओला व सुका कचरा वेगळा करा त्यामुळे प्लास्टिकवर नियंत्रण मिळवता येईल. पूर्वी एक व्यक्ती एका वर्षात 800 ग्रॅम प्लास्टिक सरासरी वापरत होता तर 2013 च्या आकडेवारीनुसार एक व्यक्ती एका वर्षात 13 किलो प्लास्टिक वापरत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, असे आवाहन यावेळी प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे यांनी केले.