शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनची वाटचाल संथ, अनेक भागांत पोहोचण्यास विलंब, शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:52 IST

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशाच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळमध्ये धडकलेला मान्सूनची वाटचाल आता मंदावली असून, तो संथपणे पुढे सरकत आहे.

नवी दिल्ली : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशाच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळमध्ये धडकलेला मान्सूनची वाटचाल आता मंदावली असून, तो संथपणे पुढे सरकत आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात मान्सून पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, असे चित्र सध्या आहे.देशात मान्सूनचे आगमन मोठ्या दिमाखात झाले. मात्र, आठवड्यातच या परिस्थितीत बदल झाला. गेल्या १० दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झाला नाही, असे कृषी हवामानशास्त्रज्ञ केली टेपली यांनी सांगितले. उत्तर-पश्चिम भागात अद्याप मान्सून सक्रीय झाला नाही. आणखी काही आठवडे हीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे. आणखी किमान एक आठवडा तरी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात काही भागांत दोन ते तीन दिवसांत तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढू शकेल. तेथील तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मान्सून अडकून पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गोव्यानंतर लगेचच कोकणपट्टीत व मुंबईत पावसाचे आगमन होते.>शेतीवर बाजारपेठा अवलंबूनभारतातील २.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. कृषि क्षेत्रातील उत्पादनावरच बाजारपेठा अवलंबून आहेत. म्हणजे, चांगले कृषि उत्पादन झाले तर, ट्रॅक्टरपासून ते सोने आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तुंवरील खर्च वाढतो. हवामान विभागाने मान्सून ९७ टक्के एवढा राहील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र त्या दृष्टीने देशभर पावसाची वाटचाल झाल्याचे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत मुंबईतही हवातसा पाऊ स पडलेला नाही. पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही काही अपवाद वगळता पाऊस कमी झाला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांच्या काही भागांत मात्र पावसाने दणका दिला आहे. असे क्वचितच घडते. तथापि, आगामी दोन दिवस दिल्लीसह उत्तर आणि उत्तर पश्चिम राज्यात धुळीसह वारे वाहू शकतात. या वाऱ्याचा वेग ३५ किमी प्रति तास एवढा असू शकतो. तसे झाल्यास दिल्ली व आसपासच्या राज्यांमध्ये धुळीचे वादळ व त्यामुळे झालेले प्रदुषण यांना आळा बसेल. तिथे लोक पावसाची वाट पाहत आहे.