शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

मान्सूनची वाटचाल संथ, अनेक भागांत पोहोचण्यास विलंब, शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:52 IST

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशाच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळमध्ये धडकलेला मान्सूनची वाटचाल आता मंदावली असून, तो संथपणे पुढे सरकत आहे.

नवी दिल्ली : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशाच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळमध्ये धडकलेला मान्सूनची वाटचाल आता मंदावली असून, तो संथपणे पुढे सरकत आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात मान्सून पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, असे चित्र सध्या आहे.देशात मान्सूनचे आगमन मोठ्या दिमाखात झाले. मात्र, आठवड्यातच या परिस्थितीत बदल झाला. गेल्या १० दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झाला नाही, असे कृषी हवामानशास्त्रज्ञ केली टेपली यांनी सांगितले. उत्तर-पश्चिम भागात अद्याप मान्सून सक्रीय झाला नाही. आणखी काही आठवडे हीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे. आणखी किमान एक आठवडा तरी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात काही भागांत दोन ते तीन दिवसांत तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढू शकेल. तेथील तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मान्सून अडकून पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गोव्यानंतर लगेचच कोकणपट्टीत व मुंबईत पावसाचे आगमन होते.>शेतीवर बाजारपेठा अवलंबूनभारतातील २.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. कृषि क्षेत्रातील उत्पादनावरच बाजारपेठा अवलंबून आहेत. म्हणजे, चांगले कृषि उत्पादन झाले तर, ट्रॅक्टरपासून ते सोने आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तुंवरील खर्च वाढतो. हवामान विभागाने मान्सून ९७ टक्के एवढा राहील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र त्या दृष्टीने देशभर पावसाची वाटचाल झाल्याचे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत मुंबईतही हवातसा पाऊ स पडलेला नाही. पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही काही अपवाद वगळता पाऊस कमी झाला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांच्या काही भागांत मात्र पावसाने दणका दिला आहे. असे क्वचितच घडते. तथापि, आगामी दोन दिवस दिल्लीसह उत्तर आणि उत्तर पश्चिम राज्यात धुळीसह वारे वाहू शकतात. या वाऱ्याचा वेग ३५ किमी प्रति तास एवढा असू शकतो. तसे झाल्यास दिल्ली व आसपासच्या राज्यांमध्ये धुळीचे वादळ व त्यामुळे झालेले प्रदुषण यांना आळा बसेल. तिथे लोक पावसाची वाट पाहत आहे.