शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

ईव्हीएमबद्दल संशय; सरकार, आयोगाला न्यायालयाची नोटीस

By admin | Updated: April 14, 2017 01:23 IST

कागदाच्या पावतीशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यास बहुजन समाज पक्षाने (बसपा) दिलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार

नवी दिल्ली : कागदाच्या पावतीशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यास बहुजन समाज पक्षाने (बसपा) दिलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी सरकार आणि आयोगाला नोटीस जारी करून ८ मे रोजी आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले. बसपाच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम म्हणाले की, व्होटर-व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेलशिवाय (व्हीव्हीपीएटी) ईव्हीएमचा वापर निवडणुकीत करण्यात आल्यामुळे मतदानाबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. मतदानानंतर मतदाराला कागदी पावती मिळणे आवश्यक आहे. कारण, त्याने कोणाला मत दिले याची तो खातरजमा करू शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)केजरीवालांचे प्रतिआव्हान- राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवा, असे आव्हान उघडपणे दिले असले तरी आयोग आपल्या सूत्रांच्या माध्यमातून ते देत आहे. मात्र, कोणतेही अधिकृत निवेदन जारी करीत नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ईव्हीएम योग्य असल्याच्या बातम्या ‘सूत्रांकडून’ कशा काय बाहेर पडतात? ही सूत्रे विश्वासार्ह आहेत का? निवडणूक आयोगाने अधिकृतरीत्या निवेदन का जारी केले नाही? मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अजून कोणीही प्रत्यक्ष अधिकृत निवेदन बघितले आहे का? काल सायंकाळपासून मी ते मिळवायचा प्रयत्न करीत आहे, असे केजरीवाल म्हणाले. आयोगाने राजकीय पक्ष, तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना ईव्हीएम मे महिन्यात हॅक करून दाखवा, असे आव्हान आयोगाने बुधवारी दिले. हे आव्हान दहा दिवसांसाठी आहे. आयोगाने आक्रमक व्हावे : एस. वाय. कुरेशीन्यूयॉर्क : मतदान यंत्रे ही पूर्णपणे सुरक्षित असून त्यात काहीही फेरफार करता येत नाही याची लोकांना खात्री देण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिक स्पष्टपणे भूमिका घ्यावी, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी म्हटले. या मतदान यंत्रांत फेरफार करता येत नाहीत व ती पुरेशी सुरक्षित आहेत. या यंत्रांबद्दल राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना आक्षेप घेण्याचा हक्क आहे. त्यांना काही प्रश्न पडले असतील तर त्यावर उपायही आहेत, असे कुरेशी म्हणाले. ईव्हीएममध्ये फेरफार करता येत नाही हे निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन आणि आक्रमकपणे सांगितले पाहिजे, असेही मत कुरेशी यांनी व्यक्त केले.