शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विहिरीतील सांगाडे १८५७च्या स्वातंत्र्य योद्ध्यांचेच; DNA पुराव्यांमुळे संशोधनास पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 10:07 IST

याआधी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे. 

अजनाला :पंजाबमधील अजनाला येथे २०१४ साली एका विहिरीत सापडलेले सुमारे २५० मानवी सांगाडे हे १९४७ साली फाळणीच्या वेळी हत्या झालेल्यांचे नसून १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्यांचे आहेत, असे आता नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे याआधी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे. 

डीएनएनवर आधारित पुरावे तसेच स्ट्रोन्टियम आयसोटोप विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की हे सांगाडे अजनाला व परिसरातील लोकांचे नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथे राहत असलेल्यांचे आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची माहितीही संशोधकांनी शोधून काढली.

यासंदर्भातील एक लेख इंटरनॅशनल जर्नल ऑफ लिगल मेडिसीन या नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला. पंजाब विद्यापीठ, लखनऊतील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्स, कॅनडातील मेमोरियल विद्यापीठ यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन केले आहे. पंजाब विद्यापीठातील फोरेन्सिक अँथ्रॉपॉलॉजिस्ट डॉ. जे. आर. सेहरावत यांनी या संशोधनात प्रमुख भूमिका बजावली आहे.

असे केले संशोधन 

सापडलेल्या मानवी सांगाड्यांतून संशोधकांनी गोळा केलेल्या ५० डीएनए नमुन्यांचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए विश्लेषण केले. तर ८५ नमुन्यांचे ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण केले. खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण उपयोगी ठरते. या नमुन्यांचे कॅनडाच्या मेमोरियल विद्यापीठातील विश्लेषणात हे सांगाडे १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

 

टॅग्स :Punjabपंजाब