शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अरुणाचलमधील सहा भागांचे चीनने केले नव्याने नामकरण

By admin | Updated: April 20, 2017 00:52 IST

दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर दावा

बीजिंग : दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर दावा करीत, तेथील सहा ठिकाणांचे चिनी भाषेत नामकरण केलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांना चीनने अधिकृतरीत्या नावे दिल्याचे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे.चीनने पहिल्यांदाच ही कृती केली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार हा भाग दक्षिण तिबेट असून, त्यावर आमचाच ताबा आहे. चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट व रोमन वर्णांनुसार मानकीकृत केले आहे. या सहा ठिकाणांचे वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्युका, बुमो ला आणि नामकापुब री असे रोमन वर्णांनुसार नामकरण केले आहे. भारत ज्या भूभागाला अरुणाचल प्रदेश असे संबोधतो, त्या प्रत्यक्षात आमच्या आणि दक्षिण तिबेटचा भाग असलेल्या सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वणार्नुसार नावे दिली आहेत, असे वृत्त ग्लोबल टाइम्सने दिले आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यामुळे दोन देशांमधील सीमा प्रश्नावरील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चीनने म्हटलं आहे. त्यातच अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांचे नामकरण करून, त्यावर आपलाच हक्क असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे. भारत व चीनमध्ये ३ हजार ४८८ किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून कायमच दक्षिण तिबेट संबोधले जाते. भारतासोबत झालेल्या १९६२ सालच्या युद्धात चीन त्यातील काही क्षेत्रावर ताबा मिळवला होता. तो सध्या अक्साई चीन म्हणून ओळखला जातो. तवांग दिल्यास अक्साई चीन मिळेल?

काही दिवसांपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा दोन्ही देशांच्या सीमेवरील भाग आपणास देण्यात यावा, अशी मागणी केली होती. पूर्वेकडील भागात भारताने चीनच्या हितांचे रक्षण केल्यास त्या बदल्यात चीनही त्याबदल्यात इतर भूभाग (अक्साई चीन) देण्याचा विचार करेल, असे चीनकडून सांगण्यात आले होते. भारतात असलेल्या तवांग जिल्हा व शहरापासून चीनची सीमा ३७ कि.मीटर अंतरावर आहे. तो परिसर बम ला पास नावानेही ओळखला जातो.