शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

यूपीत दहावी परीक्षेला ६ लाख विद्यार्थ्यांचा रामराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:35 IST

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत. धक्कादायक अशा या गोष्टीबद्दल चिंता वाटण्याऐवजी उत्तर प्रदेश सरकारने त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. परीक्षेत कॉपी व इतर गैरप्रकार करणा-यांना सरकारने चाप लावल्यामुळेच हे घडल्याचा दावा उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण खात्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले.परीक्षेकडे पाठ फिरविरणा-यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे उत्तर प्रदेशमधील नाहीत. ज्या शाळेत ते कधी गेलेच नाहीत, अशा शाळांंमध्ये नोंदणी करून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसत असत. विद्यार्थी फक्त परीक्षेच्या वेळीत दिसत. ओस पडलेल्या शाळा जिथे काहीही शिकविले जात नाही, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली. असे विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक गैरप्रकार करीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याऐवजी भलत्यांनाच परीक्षेला बसवले जात असे. त्यात पैशाची मोठी उलाढालही होते. या अपप्रवृत्तींना सरकारने यंदा चाप लावला आहे असे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळानेही म्हटले आहे. परीक्षेत पहिल्या तीन पेपरना ६,३३,२१७ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. परीक्षा पूर्ण होईपर्यंत हा आकडा वाढून साडेसात लाखाच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :examपरीक्षा