शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय

By admin | Updated: September 19, 2016 14:35 IST

उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

सुरेश डुग्गर, ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कुठल्याही परिस्थितील पाकिस्तानला आता धडा शिकवाच अशी देशवासियांची भावना असून, मोदी सरकारवरील दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानवर कारवाई करण्याचे भारतासमोर काय-काय पर्याय उपलब्ध आहेत. 
 
१) पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र हल्ल्याव्दारे नष्ट करण्याचा पर्याय आहे. यासाठी पृथ्वी-ब्राम्होस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा उपयोग करता येईल तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिराज, सुखोई या लढाऊ विमानांव्दारे हवाई हल्ला करता येऊ शकतो. पण या पर्यायांच अवलंब केल्यास दोन्ही देशांमध्ये मोठया युद्धाला तोंड फुटेल. 
 
आणखी वाचा 
 
२) जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने कमांडो कारवाईव्दारे प्रत्युत्तर दिले होते. भारतीय कमांडोजनी म्यानमारमध्ये जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या पर्यायाचाही वापर होऊ शकतो. भारतीय कमांडोंना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवून दहशतवादी तळ नष्ट करता येतील पण या पर्यायाचा वापर करतानाही सैन्याने पाकिस्तानी हद्द ओलांडल्यास युद्धाला तोंड फुटेल. 
 
३) दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला संपूर्ण जगात एकाकी पाडण्याचा पर्याय आहे. भारत अनेक दशकापासून याचा पर्यायाचा वापर करत आला आहे. पण त्याने फार काही साध्य झालेले नाही. भारतीय भूमीवरील पाकिस्तानचे हल्ले थांबलेले नाहीत. 
 
४) पाकिस्तानातील निवडून आलेल्या सरकारबरोबर व्दिपक्षीय चर्चेचा पर्याय आहे. पण मोदी सरकारने आधीच दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्दिपक्षीय चर्चा होऊ शकत नाही. 
 
५) पाकिस्तान ज्या प्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करत आहे. भारताने त्याप्रमाणे बलुचिस्तानचा मुद्दा अधिक प्रभावीपणे लावून धरावा. त्यामुळे पाकिस्तानची जम्मू-काश्मीर संदर्भातील रणनिती कमकुवत होईल. 
 
६) संसदेवर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी सीमेवर मोठया प्रमाणावर सैन्य आणून ठेवले होते.  पाकिस्तानातून भारतीय हद्दीत नागरी विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पाकिस्तानातून भारतीय उच्चायुक्तांना माघारी बोलवून घेतले होते. सर्व संबंध तोडून टाकले होते. या पर्यायाचा सुद्धा मोदी वापर करु शकतात.