शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय

By admin | Updated: September 19, 2016 14:35 IST

उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

सुरेश डुग्गर, ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कुठल्याही परिस्थितील पाकिस्तानला आता धडा शिकवाच अशी देशवासियांची भावना असून, मोदी सरकारवरील दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानवर कारवाई करण्याचे भारतासमोर काय-काय पर्याय उपलब्ध आहेत. 
 
१) पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र हल्ल्याव्दारे नष्ट करण्याचा पर्याय आहे. यासाठी पृथ्वी-ब्राम्होस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा उपयोग करता येईल तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिराज, सुखोई या लढाऊ विमानांव्दारे हवाई हल्ला करता येऊ शकतो. पण या पर्यायांच अवलंब केल्यास दोन्ही देशांमध्ये मोठया युद्धाला तोंड फुटेल. 
 
आणखी वाचा 
 
२) जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने कमांडो कारवाईव्दारे प्रत्युत्तर दिले होते. भारतीय कमांडोजनी म्यानमारमध्ये जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या पर्यायाचाही वापर होऊ शकतो. भारतीय कमांडोंना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवून दहशतवादी तळ नष्ट करता येतील पण या पर्यायाचा वापर करतानाही सैन्याने पाकिस्तानी हद्द ओलांडल्यास युद्धाला तोंड फुटेल. 
 
३) दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला संपूर्ण जगात एकाकी पाडण्याचा पर्याय आहे. भारत अनेक दशकापासून याचा पर्यायाचा वापर करत आला आहे. पण त्याने फार काही साध्य झालेले नाही. भारतीय भूमीवरील पाकिस्तानचे हल्ले थांबलेले नाहीत. 
 
४) पाकिस्तानातील निवडून आलेल्या सरकारबरोबर व्दिपक्षीय चर्चेचा पर्याय आहे. पण मोदी सरकारने आधीच दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्दिपक्षीय चर्चा होऊ शकत नाही. 
 
५) पाकिस्तान ज्या प्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करत आहे. भारताने त्याप्रमाणे बलुचिस्तानचा मुद्दा अधिक प्रभावीपणे लावून धरावा. त्यामुळे पाकिस्तानची जम्मू-काश्मीर संदर्भातील रणनिती कमकुवत होईल. 
 
६) संसदेवर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी सीमेवर मोठया प्रमाणावर सैन्य आणून ठेवले होते.  पाकिस्तानातून भारतीय हद्दीत नागरी विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पाकिस्तानातून भारतीय उच्चायुक्तांना माघारी बोलवून घेतले होते. सर्व संबंध तोडून टाकले होते. या पर्यायाचा सुद्धा मोदी वापर करु शकतात.