शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

सीताराम येचुरींना काँग्रेस राज्यसभेवर पाठविणार?

By admin | Published: April 23, 2017 1:06 AM

धर्मनिरपेक्षतेसाठीचा संघर्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसने माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

धर्मनिरपेक्षतेसाठीचा संघर्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसने माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येचुरी यांचा कार्यकाळ १८ आॅगस्ट २०१७ रोजी संपत आहे. तथापि, काँग्रेसच्या या निर्णयामुळे माकपात वादाची शक्यता आहे.दोनदा राज्यसभेवर पाठविल्यानंतर तिसऱ्यांदा कोणालाही राज्यसभेवर न पाठविण्याची परंपरा नसून, याच परंपरेचे पालन करण्याबाबत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि माजी सरचिटणीस प्रकाश करात हे आग्रही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकपाचे सरचिटणीस संसद सदस्य होऊ शकत नाही. तथापि, येचुरी हे सरचिटणीस झाले, तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते.काँग्रेसचे पी. भट्टाचार्य यांच्या राज्यसभेतील सदस्यात्वाची मुदत येचुरी यांच्यासोबत संपत आहे. तथापि, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भट्टाचार्य यांना पुन्हा उमेदवारी न देता, माकपचे सीताराम येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार राहुल यांनी येचुरी यांची भेट घेऊन काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा शब्द दिला आहे. डाव्या पक्षाच्या अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही. अशा स्थितीत काँग्रेस आपला उमदेवार उभा करील, असे स्पष्ट करीत सांप्रदायिक शक्तीविरुद्ध लढण्यासाठी येचुरी हेच हवेत, असे राहुल यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन सर्वांनी येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा सल्लाही राहुल यांनी दिला होता.माकपमध्ये विजयन आणि करात यांचा येचुरींना विरोध असल्याने माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल. पश्चिम बंगालमध्ये बैठक होणार आहे. येचुरींनी अनेक प्रदेश शाखांचा पाठिंबा मिळविला आहे. तेव्हा विजयन आणि करात गटाकडून विरोध होणे अटळ आहे. राज्य नेतृत्वाला स्पष्ट सूचना- राहुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांना बोलावून पश्चिम बंगालमधील सर्व आमदारांचा पाठिंबा येचुरी यांना मिळाला पाहिजे, असे स्पष्ट सांगितले आहे. - चौधरी यांनीही हा निर्णय काँग्रेसच्या आमदारांना कळविला आहे. विशेष म्हणजे, १८ आॅगस्ट २०१७ रोजी पश्चिम बंगालमधील राज्यसभेचे ७ सदस्य निवृत्त होत आहेत.- यात बंदोपाध्याय, पी. भट्टाचार्य, डेरेक ओ’ब्रायन, सुखेंदू सेकर, डोला सेन आणि सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. इतर चार सदस्य तृणमूलचे आहेत.