शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

बुलंदशहरातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:29 IST

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता.

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली; मात्र मुख्य आरोपी व बजरंग दलाचा कार्यकर्ता योगेश राज हा फरार झाला. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षकाच्या पत्नीला ४० लाख रुपये, त्याच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याचे व त्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी सेवेत सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. बजरंग दलासह आणखी एका संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे; मात्र त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. मृत प्राण्यांचे सापडलेले अवशेष गायीचेच आहेत का, याबद्दल निश्चिती झालेली नाही. २०१५ साली दादरी येथे गोहत्या केल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाक याला मारहाण करून ठार मारण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांच्याकडे होता. त्यामुळेच हिंसाचारात त्यांना ठार मारण्यात आले, असा आरोप सुबोधकुमार यांच्या बहिणीने केला. कुटुंबीयांना भरपाई नको आहे. आदित्यनाथ फक्त गोरक्षणाचा धोशा लावत आहेत, असेही तिने उद्वेगाने सांगितले. (वृत्तसंस्था)>संघ परिवारच जबाबदार : मंत्र्याचा आरोपहा हिंसाचार पूर्वनियोजित असून, तो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा. स्व. संघ यांनी घडवून आणला, असा आरोप उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील राज्यमंत्री व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. दरम्यान, मानवाधिकार आयोगाने राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस देऊन चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ