शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Madhya Pradesh : सिंगरौली जिल्हाधिकार्‍यांचा कठोर निर्णय, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले नाहीत तर FIR दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:42 IST

Corona Vaccination : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सिंगरौली :  कोरोना व्हायरसवर  (Coronavirus) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही ठिकाणी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत, तर काही ठिकाणी सक्ती केली जात आहे. यात आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची लस न घेतल्यास एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. 

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील लोक लसीचे दोन्ही डोस टाळू शकत नाहीत. त्यांनी असे केल्यास त्यांच्यावर सामान्य कारवाईसह एफआयआरही दाखल होईल. यासाठी जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी कडक आदेश काढले आहेत. आदेशानुसार, 15 डिसेंबरपर्यंत दोन्ही डोस न घेतल्यास सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल, खासगी संस्था किंवा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. 

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. 15 डिसेंबरनंतर ज्यांना वैद्यकीय सल्ल्याने लस न घेण्याबाबत सांगितले आहे, त्यांना यातून दिलासा मिळणार आहे.  विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापूर्वी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानेही असाच आदेश काढला होता. ज्या कुटुंबातील सदस्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्याच कुटुंबाला रेशन दिले जाईल, असे विभागाने सांगितले होते. 

इंदूरच्या लोकांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस लवकर घ्यावेत, अन्यथा 30 नोव्हेंबरनंतर तुम्हाला दूध, रेशन किंवा जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. एवढेच नाही तर देव दर्शन घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही मंदिराचा दरवाजा ओलांडू शकणार नाही. इंदूरच्या सर्व व्यापारी संघटना आणि मंदिर व्यवस्थापकांनी हा निर्णय घेतला आहे. 

खरंतर, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती घालवण्यासाठी इंदूर प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून मोहीम सुरू केली आहे, त्याअंतर्गत सर्व व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापन आणि अनेक संघटनांना कोरोना योद्धा म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरनंतर लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय ग्राहक किंवा विक्रेत्याला आत प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. 

याचबरोबर, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले नाहीत, अशा लोकांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही.  इंदूरमध्ये शंभर टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि साठ टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेश