शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Madhya Pradesh : सिंगरौली जिल्हाधिकार्‍यांचा कठोर निर्णय, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले नाहीत तर FIR दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:42 IST

Corona Vaccination : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सिंगरौली :  कोरोना व्हायरसवर  (Coronavirus) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही ठिकाणी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत, तर काही ठिकाणी सक्ती केली जात आहे. यात आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची लस न घेतल्यास एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. 

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील लोक लसीचे दोन्ही डोस टाळू शकत नाहीत. त्यांनी असे केल्यास त्यांच्यावर सामान्य कारवाईसह एफआयआरही दाखल होईल. यासाठी जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी कडक आदेश काढले आहेत. आदेशानुसार, 15 डिसेंबरपर्यंत दोन्ही डोस न घेतल्यास सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल, खासगी संस्था किंवा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. 

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. 15 डिसेंबरनंतर ज्यांना वैद्यकीय सल्ल्याने लस न घेण्याबाबत सांगितले आहे, त्यांना यातून दिलासा मिळणार आहे.  विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापूर्वी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानेही असाच आदेश काढला होता. ज्या कुटुंबातील सदस्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्याच कुटुंबाला रेशन दिले जाईल, असे विभागाने सांगितले होते. 

इंदूरच्या लोकांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस लवकर घ्यावेत, अन्यथा 30 नोव्हेंबरनंतर तुम्हाला दूध, रेशन किंवा जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. एवढेच नाही तर देव दर्शन घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही मंदिराचा दरवाजा ओलांडू शकणार नाही. इंदूरच्या सर्व व्यापारी संघटना आणि मंदिर व्यवस्थापकांनी हा निर्णय घेतला आहे. 

खरंतर, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती घालवण्यासाठी इंदूर प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून मोहीम सुरू केली आहे, त्याअंतर्गत सर्व व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापन आणि अनेक संघटनांना कोरोना योद्धा म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरनंतर लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय ग्राहक किंवा विक्रेत्याला आत प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. 

याचबरोबर, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले नाहीत, अशा लोकांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही.  इंदूरमध्ये शंभर टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि साठ टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेश