शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘नुसते मास्क चालणार नाही’, पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 01:21 IST

व्यापक उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ सामाजिक अंतराचे पथ्य पाळून कोविड-१९च्या संसर्गास आळा बसणार नसून तपासण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ करत पॉजिटिव्ह रुग्णांबरोबरच लक्षणविरहित बाधितांचेही विलगीकरण करण्याची सिंगापूर, दक्षिण कोरिया व जपानची कार्यपद्धती आचरणात आणली जावी, अशी मागणी पंतप्रधानाना पत्र लिहून देशभरातील ६०० वैज्ञानिकांनी केली आहे. 

भविष्यात लक्षावधी रुग्णांवर एकाच वेळी उपचार करण्याची पाळी येऊ शकते, याचे भान ठेवून आरोग्य सुविधांचा प्रचंड विस्तार करण्याची गरज या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.  लक्षणे न दिसणा-या, मात्र त्यांचा संसर्ग पसरवणा-या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच योग्य ते उपचार करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

या वैज्ञानिकांनी पंतप्रधानांकडे केलेल्या अन्य शिफारशी याप्रमाणे:

nदेशांतील बहुतेक संशोधन संस्था व विद्यापीठांतील प्राणीशास्त्र विभागांत आरटी- पीसीआर यंत्रे आहेत; त्यांचा वापर कोविड तपासणीसाठी केला जावा. या संस्थेतील अध्यापक व विद्यार्थी आपली सेवा देण्यास तयार आहेत; त्यांचा वापर व्हावा..

nएखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्याच्या निवासाचा समग्र परिसर, शेजारीपाजारी, नजिकची बाजारपेठ, तसेच त्या व्यक्तीने भेट दिलेल्या भागांतील जनतेची तपासणी केली जावी. यासाठी चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढवावे, चाचणी कीट्स व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे व विज्ञान शाखेच्या बेकार पदवीधरांना सेवेत घेऊन प्रशिक्षण देण्यात यावे.

nकोरोना विषाणूच्या जनुकीय सिक्वेन्सिंगमध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. विषाणूची किती उत्प्रेरिके देशात सक्रिय आहेत, याविषयीची माहितीही उपलब्ध नाही. यामुळे कोविड व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. त्या दूर करताना भारतीय रुग्णांचे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे प्रमाण वाढवून ती माहिती जाहीर करव्यात. 

nथेट प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विलगीकरण विभाग कुरू करण्यात यावेत. खासगी रुग्णालयांतील संसाधनांच्या मदतीने खास विभाग तयार करून तेथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. देशातील इनडोअर स्टेडियम व तत्सम सुविधांना कोविड रुग्णालयांत रूपांतरित करावे व तेथे काम करण्यासाठी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांचे साहाय्य घ्यावे. 

nआरोग्यकर्मींसाठी मोठ्या प्रमाणात पीपीई गिअर, तसेच आम लोकांसाठी मास्क व सॅनिटायझरचे उत्पादन वाढवताना लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांना त्या कामासाठी वापरावे.nअत्यल्प वेळेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स उत्पादित करण्याचे आव्हान देशासमोर आहे. तुलनेने स्वस्त असलेल्या व्हेंटिलेटर्सचे डिझाईन देशातील संशोधकानी तयार केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपले डिझाईन उघड केले आहेत. भारतीय उत्पादकांना हे व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यासाठी उत्तेजन दिले जावे.nआकस्मिक लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांनी दाटीवाटीने राहू नये यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने त्यांच्या प्रस्थानाची व्यवस्था करण्यात यावी 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या