शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सिमी’चे शिबिर घेणारे १८ ठरले दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:48 IST

केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.

कोची : केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.एकूण ३५ आरोपींवर हा खटला चालला. हे आरोपी भोपाळ, नवी दिल्ली, बंगळुरु आणि अहमदाबाद येथील कारागृहांत असल्याने न्यायाधीश कौसर इद्दापगाथ यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून खटला चालवला. जे १८ आरोपी दोषी ठरले त्यांत केरळचे चौघे आहेत. त्यात अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या शिमली व शिबली या दोन भावांचाही समावेश आहे. आरोपींना देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे तसेच शस्त्र कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी ठरविले गेले.वागामोनमधील थंगलपाडा येथे १० ते १२ डिसेंबर २००७ दरम्यान ‘सिमी’चे ने गुप्तपणे शिबिर घेतले. हे समजल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाअंती एकूण ३८ आरोपींना अटक केली. वासिक बिल्लासह दोन आरोपी फरार असून मेहबूब मलिक हा २००१६ मध्ये भोपाळ कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. (वृत्तसंस्था)>भारतीय बिन लादेनचा सहभागया शिबिरात युद्धकला, शस्त्रे चालविणे, बॉम्ब तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले गेले. याच शिबिरांमधून पुढे ‘इंडिन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. या प्रशिक्षणाचा उपयोग करून नंतर देशात अनेक घातपात करण्यात आले. नंतर ‘भारतीय बिन लादेन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या व ‘इंडियन मुजाहिदीन’चा संस्थापक सदस्य अब्दुल शुभान कुरेशी ऊर्फ तकीर यानेही वागामोन शिबिरात प्रशिक्षण घेतले होते.