शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

सिक्किमचा विक्रम अबाधित!

By admin | Updated: February 11, 2015 02:16 IST

विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे

वसंत भोसले, कोल्हापूरविविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे. विरोधकांना किमान १० टक्के जागा जिंकून अधिकृत विरोधी पक्षाचे स्थानही मिळू दिलेले नाही. तसाच प्रकार आज (मंगळवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ७०पैकी ६७ जागा जिंकून घडवून आणला असला तरी सिक्किममधील २००९च्या निवडणुकीत सिक्किम डेमॉक्रॅटीक फ्रंटने नोंदविलेला विक्रम अबाधित आहे. या पक्षाने सिक्किम विधानसभेच्या ३२पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. असा विक्रम देशातील कोणत्याही विधानसभेत व कोणत्याही पक्षाने आजवर नोंदवलेला नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भारतीय राज्यघटनेनुसार होत आलेल्या आहेत. त्या निवडणुकांचे निकाल संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचे आणि मनोरंजनाचेही आहेत. आपल्या देशात २९ राज्य विधानसभा आणि २ केंद्रशासित (दिल्ली आणि पाँडेचेरी) विधानसभा आहेत. यापैकी महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सिक्किम, आणि आता दिल्लीच्या निवडणुकीत एखाद्या पक्षाने एकतर्फी निवडणुका जिंकून सत्ता हस्तंगत केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या विधानसभा निवडणुकीत १९६२मध्ये काँग्रेसने २६४पैकी २१५ जागा जिंकल्या होत्या. किमान २६ जागा जिंकून विरोधीपक्षाचे स्थान कोणत्याही पक्षाला मिळविता आले नव्हते. प्रजा समाजवादी पक्षाला ९, समाजवादी १, शेतकरी कामगार पक्ष १५, रिपब्लिकन ३, कम्युनिस्ट पक्षाला ६ जागा मिळाल्या होत्या तर उर्वरित १५ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. असाच विक्रम १९९१मध्ये तामिळनाडूत जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवताना केला आहे. या आघाडीने तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी २२४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी १६८ जागा जिंकणाऱ्या अण्णा द्रमुकला १६४ तर काँग्रेसने ६५ जागा लढवत ६० जागा जिंकल्या होत्या. एम. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ द्रमुक पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते.