शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीममध्ये सेंद्रिय भाज्यांचे ८० हजार टन झाले उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे.

गंगटोक : संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे. मात्र शेतक-यांच्या मालाला अधिकाधिक किंमत मिळावी यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे.सिक्कीमच्या फळबागा आणि नगदी पीक विकास विभागाचे सचिव खोर्लो भुतिया यांनी सांगितले की, आमची बांधिलकी प्रदर्शित करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ८० हजार टन सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन केले. या भाज्या १०० टक्के रसायनमुक्त असून, १४ हजार हेक्टर क्षेत्रावर त्या पिकविण्यात आल्या. ‘मिशन आॅरगॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट’ने ईशान्य भारतात एकूण ७६ हजार ३९२ हेक्टर शेतजमीन सेंद्रिय शेतीसाठी निश्चित केली आहे.भुतिया म्हणाले की, एवढे उत्पादन होऊनही राज्याला भाजीपाल्याची स्वत:ची गरज पूर्णपणे भागविता आलेली नाही. स्वयंपूर्णतेसाठी १ हजार टन भाज्यांची तूट राहिली. मिशनची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. त्यासाठी उरलेली शेतजमीन वापरली जाईल.पहिल्या टप्प्यात सेंद्रिय शेतीसाठी १४ हजार हेक्टर क्षेत्र वापरण्यात आले. या मिशनअंतर्गत मालाचे उत्पादनोत्तर व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या बाबी २०१८ पर्यंत पूर्ण केल्या जातील. सरकारने मिशनचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मिशनमध्ये २८ संघटनांचे २४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. एकूण ४१ क्लस्टर्समध्ये विविध सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यात आली, असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, शेतकºयांना उत्पादित मालाची अधिकाधिक किंमत मिळावी, त्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी इफ्कोसोबत संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. इफ्को ही देशातील सर्वात मोठी शेतकरी सहकारी संस्था आहे. सिक्कीम-इफ्को संयुक्त उपक्रमांतर्गत पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत एकात्मिक प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन लाभ (इन्सेंटिव) दिला जात आहे. शेतकºयांना ई-व्हाऊचरच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट केले जात आहे. (वृत्तसंस्था)फळे आणि धान्येही-या वर्षात सिक्कीममध्ये १०० टन चेरी आणि १०० टन सेंद्रिय किवी फळे उत्पादित करण्यात आली. पथदर्शक प्रकल्पांतर्गत मोठी इलायची, अद्रक, हळद, हिरण्य गहू यांचेही उत्पादन घेण्यात आले.

टॅग्स :organic vegetablesसेंद्रिय भाज्या