शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

सिक्कीममध्ये सेंद्रिय भाज्यांचे ८० हजार टन झाले उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे.

गंगटोक : संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे. मात्र शेतक-यांच्या मालाला अधिकाधिक किंमत मिळावी यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे.सिक्कीमच्या फळबागा आणि नगदी पीक विकास विभागाचे सचिव खोर्लो भुतिया यांनी सांगितले की, आमची बांधिलकी प्रदर्शित करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ८० हजार टन सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन केले. या भाज्या १०० टक्के रसायनमुक्त असून, १४ हजार हेक्टर क्षेत्रावर त्या पिकविण्यात आल्या. ‘मिशन आॅरगॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट’ने ईशान्य भारतात एकूण ७६ हजार ३९२ हेक्टर शेतजमीन सेंद्रिय शेतीसाठी निश्चित केली आहे.भुतिया म्हणाले की, एवढे उत्पादन होऊनही राज्याला भाजीपाल्याची स्वत:ची गरज पूर्णपणे भागविता आलेली नाही. स्वयंपूर्णतेसाठी १ हजार टन भाज्यांची तूट राहिली. मिशनची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. त्यासाठी उरलेली शेतजमीन वापरली जाईल.पहिल्या टप्प्यात सेंद्रिय शेतीसाठी १४ हजार हेक्टर क्षेत्र वापरण्यात आले. या मिशनअंतर्गत मालाचे उत्पादनोत्तर व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या बाबी २०१८ पर्यंत पूर्ण केल्या जातील. सरकारने मिशनचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मिशनमध्ये २८ संघटनांचे २४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. एकूण ४१ क्लस्टर्समध्ये विविध सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यात आली, असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, शेतकºयांना उत्पादित मालाची अधिकाधिक किंमत मिळावी, त्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी इफ्कोसोबत संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. इफ्को ही देशातील सर्वात मोठी शेतकरी सहकारी संस्था आहे. सिक्कीम-इफ्को संयुक्त उपक्रमांतर्गत पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत एकात्मिक प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन लाभ (इन्सेंटिव) दिला जात आहे. शेतकºयांना ई-व्हाऊचरच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट केले जात आहे. (वृत्तसंस्था)फळे आणि धान्येही-या वर्षात सिक्कीममध्ये १०० टन चेरी आणि १०० टन सेंद्रिय किवी फळे उत्पादित करण्यात आली. पथदर्शक प्रकल्पांतर्गत मोठी इलायची, अद्रक, हळद, हिरण्य गहू यांचेही उत्पादन घेण्यात आले.

टॅग्स :organic vegetablesसेंद्रिय भाज्या