शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीम, अरुणाचल सिमेवर सैन्य वाढवले, चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:53 IST

डोकलाममधून मागे हटण्याच्या चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारतानेही सिक्कीम, अरुणाचल प्रदेशांतील सीमेवर सैन्य वाढविले आहे. चीनची खुमखुमी कायम असून, सतत युद्धाची भाषा बोलली जात आहे.

 नवी दिल्ली : डोकलाममधून मागे हटण्याच्या चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारतानेही सिक्कीम, अरुणाचल प्रदेशांतील सीमेवर सैन्य वाढविले आहे. चीनची खुमखुमी कायम असून, सतत युद्धाची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहण्यासाठी सैन्य वाढल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. दुसरीकडे कोणत्याही संकटाला वा अडचणींचा सामना करायला भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केले आहे.तिबटेच्या काही भागात चीनने आपले सैन्य आणायला सुरुवात केली असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधता जेटली यांनी वरील विधान केले. भारतीय लष्कराकडे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती शस्त्रसामग्री आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज भूतानचे परराष्ट्रमंत्री दामचो दोरजी यांच्याशी चर्चा केली. डोकलामशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्या चर्चेचा भर होता,असे सांगण्यात आले. मात्र चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आला नाही.चिनी सैन्य मागे जाणार नाही; दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोरबीजिंग : भारताशी तडजोड करण्यासाठी चीन आपले सैन्य डोकलाममधून मागे घेईल, अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे चीनने स्पष्ट केले आहे. चीन आपले सैन्य १00 मीटर मागे घेण्यास राजी झाल्याचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.‘चायना डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे. चीनची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला.दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी, अशी भूमिका भारताने मांडली आहे. जूनमध्ये हा पेचप्रसंग निर्माण झाला असून, भारत व चीनचे सैन्य सिक्किम, भूतान व चीन या तिघांचा संगम होत असलेल्या डोकलाम भागात समोरासमोर ठाकले आहे.