शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी शीख भाविकांना व्हिसाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:02 IST

भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.

अटारी/वाघा : भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याकरिता भारत व पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसºया टप्प्यातील बैठक अटारी-वाघा सीमेवर रविवारी पार पडली. त्यात भारताच्या अनेक मागण्या पाकने मान्य केल्या.या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाºया भारतीयांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखावे, गुरुद्वारामध्ये भारतीय राजदूतावासाच्या कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याची परवानगी मिळावी, सीमेलगत कर्तारपूर कॉरिडॉरला जोडणारा पूल भारताप्रमाणे पाकिस्ताननेही लवकरात लवकर बांधावा, अशा मागण्या भारताने या बैठकीत केल्या. पाकच्या बाजूने रावी नदीवर असा पुल बांधण्याच्या कामात अजून फारशी प्रगती झालेली नाही. या बैठकीला भारताच्या गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास, परराष्ट्र मंत्रालय, पंजाब सरकार, नॅशनल हायवे आॅथॉरिटीज आॅफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते.>आॅक्टोबर अखेरीस काम पूर्णकर्तारपूर कॉरिडॉरचे भारताच्या हद्दीतील बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इथे ४ लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी सुरू आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर्षात तसेच विशेष प्रसंगी भारतातून रोज अतिरिक्त १० हजार भाविकांना कर्तारपूरला येण्याची परवानगी पाककडून मिळावी, असा आग्रह आहे.