शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी शीख भाविकांना व्हिसाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:02 IST

भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.

अटारी/वाघा : भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याकरिता भारत व पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसºया टप्प्यातील बैठक अटारी-वाघा सीमेवर रविवारी पार पडली. त्यात भारताच्या अनेक मागण्या पाकने मान्य केल्या.या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाºया भारतीयांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखावे, गुरुद्वारामध्ये भारतीय राजदूतावासाच्या कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याची परवानगी मिळावी, सीमेलगत कर्तारपूर कॉरिडॉरला जोडणारा पूल भारताप्रमाणे पाकिस्ताननेही लवकरात लवकर बांधावा, अशा मागण्या भारताने या बैठकीत केल्या. पाकच्या बाजूने रावी नदीवर असा पुल बांधण्याच्या कामात अजून फारशी प्रगती झालेली नाही. या बैठकीला भारताच्या गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास, परराष्ट्र मंत्रालय, पंजाब सरकार, नॅशनल हायवे आॅथॉरिटीज आॅफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते.>आॅक्टोबर अखेरीस काम पूर्णकर्तारपूर कॉरिडॉरचे भारताच्या हद्दीतील बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इथे ४ लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी सुरू आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर्षात तसेच विशेष प्रसंगी भारतातून रोज अतिरिक्त १० हजार भाविकांना कर्तारपूरला येण्याची परवानगी पाककडून मिळावी, असा आग्रह आहे.