शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिद्धू यांना शिक्षा भोगावीच लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:17 IST

उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे.

- बलवंत तक्षकचंदीगड : उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे. तो पंजाबमधील मंत्रिमंडळात असला तरी त्याच सरकारने नवज्योत सिद्धू यांना एका जुन्या प्रकरणात तीन वर्षे शिक्षा व्हायलाच हवी, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.नवज्योत सिद्धू याला १९८८ साली एका कार अपघात प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षे शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणात त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असल्याने तो मोकळेपणे फिरू शकतो. पण त्या प्रकरणात त्याला दिलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवावी, असे पंजाब सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. दुसरीकडे पीडित कुटुंबीयांनी सिद्धूची शिक्षा वाढवण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे.पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू असला तरी त्या दोघांतून विस्तव जात नाही. दोघे एकमेकांविषयी चांगले बोलत असले, जाहीर कार्यक्रमात गळ्यात गळे घालत असले तरी त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यातच नवज्योत सिद्धू यांनी शिक्षा भोगायलाच हवी, असे पंजाब सरकारने म्हटल्यामुळे दोन नेत्यांतील वाद पराकोटीला जाईल, अशी चर्चा आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील नगरपालिका, महापालिका काँग्रेसने जिंकल्या. पण महापौर निवडताना सिद्धू यांना अजिबातच विचारात घेतले नाही. अमृतसरमध्ये तर त्यांना नको असलेल्या व्यक्तीला महापौर करण्यात आले. एकूणच मंत्री असलेले सिद्धू काँग्रेसमध्ये अद्याप अस्थिरच आहेत. त्यातच पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे आसन अधिकच अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसमधील या वादाचा फायदा घेत भाजपाने सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाचे केंद्रीय सचिव तरुण चुघ म्हणाले की, आपल्याच मंत्र्याच्या विरोधात पंजाब सरकार गेले आहे. असे प्रथमच घडते आहे. त्यामुळे सिद्धू यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून दूर करावे.>काँग्रेसमध्ये घेण्यावरून होती नाराजीआधी भाजपामध्ये असलेले नवज्योत सिद्धू हे काँग्रेसमध्ये आले राहुल गांधी यांच्यामुळे. त्याआधी ते आम आदमी पक्षात जाणार, अशी चर्चा होती. सिद्धू व केजरीवाल यांच्यात बोलणीही सुरू होती. आपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन न दिल्याने आणि पंजाबमध्ये आपला सत्ता मिळेल, अशी खात्री न वाटल्यामुळे सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागताला स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंग अजिबात उत्सुक नव्हते, या इतिहासाचा इथे उल्लेख करणे गरजेचे आहे.नवज्योत सिद्धू यांना शिक्षा झाली असल्याने म्हणजेच ते दोषी ठरले असल्याने त्यांना मंत्री करण्यास कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध होता. पण शिक्षेला न्यायालयाने दिलली स्थगिती व मिळालेला जामीन यांमुळे त्यांना मंत्री करण्यात काहीही कायदेशीर अडचण नाही, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे सिद्धू मंत्री झाले. पण ते किती काळ टिकणार, हा प्रश्नच आहे.