शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

तृतीयपंथींनी काशीत केले श्राद्धविधी; पुन्हा ‘असा’ जन्म न मिळो!

By admin | Updated: September 26, 2016 00:50 IST

हिंदूंच्या सर्वात पवित्र काशी नगरीत एक क्रांतिकारी घटना घडली. देशभरातून आलेल्या शेकडो तृतियपंथींनी येथील काशी विश्वनाथ व अन्नपूर्णा मंदिरात महापूजा केली व पितृपक्षाचे निमित्त साधून गंगाकिनारी

वाराणसी : हिंदूंच्या सर्वात पवित्र काशी नगरीत एक क्रांतिकारी घटना घडली. देशभरातून आलेल्या शेकडो तृतियपंथींनी येथील काशी विश्वनाथ व अन्नपूर्णा मंदिरात महापूजा केली व पितृपक्षाचे निमित्त साधून गंगाकिनारी आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्मही केले.कदाचित मुगल साम्राज्याच्या काळानंतर गेल्या चार दशकांत समाजातील या तिरस्कृत घटकास हे धार्मिक विधी काशीसारख्या कर्मठ तीर्थक्षेत्री प्रथमच करू दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने तृतियपंथींना स्वतंत्र ओळख दिल्याने ते अधिक उजळ माथ्याने जगू लागले आहेत व समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे, याचे हे स्वागतार्ह द्योतक मानले जात आहे.सध्या सुरु असलेल्या पितृपक्षात लाखो श्रद्धाळू हिंदू विविध तीर्थक्षेत्रांवर आणि पवित्र संगमांवर जाऊन आपल्या पितरांचे तर्पण करीत आहेत. यानुसार शेकडो तृतीयपंथींनी त्यांच्या धार्मिकगुरु महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ मंदिरात आणि माँ अन्नपूर्णा मंदिरात दुग्धाभिषेक व षोडषोपचार पूजा केली. या तृतियपंथी भक्तांनी बाबा विश्वनाथाच्या पिंडीवर ११ लिटर दुधाचा अभिषेक केला व त्यानंतर त्यांना रीतीनुसार ‘मांग वस्त्र’ (सुवासिनीचे वाण) व प्रसाद देण्यात आला, असे विश्वनाथ मंदिराचे पुजारी आचार्य श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. यानंतर या तृतियपंथींनी माँ अन्नपूर्णेच्या दरबारात जाऊन ‘कुकुंमार्जन’ केले व सर्वाच्या सुख, समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली.यानंतर या समुहाने गंगेच्या काठी जाऊन आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी, यासाठी विधिवत श्राद्धकर्म केले. इतरांप्रमाणे आमच्याही श्रद्धा आणि भाव-भावना असतात. इतरांप्रमाणे आम्हालाही आपल्या पूर्वजांच्या ऋणातून श्राद्धविधीने उतराई व्हावे, असे मनापासून वाटते. परंतु इतकी वर्षे आम्हाला बहिष्कृताची वागणूक देऊन पंडित व पुजारी मंदिरातही येऊ देत नसत. आता आम्ही पुजाऱ्यांचे मन वळविले व तेही तयार झाले. म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने एकदमच येथे आलो, अशी भावना एका तृतियपंथीने सर्वांच्या वतीने व्यक्त केली.शेकडो वर्षांनी आम्हाला काशीत उजळ माथ्याने, कोणताही भेदभाव आणि तिरस्कार न करता पूजा व श्राद्धविधी करू दिले गेले याचा त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. एक वयोवद्ध तृतियपंथी म्हणाली की, असे बहुधा दुसऱ्यांदा घडले. याआधी मुगलांच्या साम्राज्यात असे घडले होते,असे आमच्या कित्येक पिढ्यांना लहानपणापासून सांगण्यात येत असे.