शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

तृतीयपंथींनी काशीत केले श्राद्धविधी; पुन्हा ‘असा’ जन्म न मिळो!

By admin | Updated: September 26, 2016 00:50 IST

हिंदूंच्या सर्वात पवित्र काशी नगरीत एक क्रांतिकारी घटना घडली. देशभरातून आलेल्या शेकडो तृतियपंथींनी येथील काशी विश्वनाथ व अन्नपूर्णा मंदिरात महापूजा केली व पितृपक्षाचे निमित्त साधून गंगाकिनारी

वाराणसी : हिंदूंच्या सर्वात पवित्र काशी नगरीत एक क्रांतिकारी घटना घडली. देशभरातून आलेल्या शेकडो तृतियपंथींनी येथील काशी विश्वनाथ व अन्नपूर्णा मंदिरात महापूजा केली व पितृपक्षाचे निमित्त साधून गंगाकिनारी आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्मही केले.कदाचित मुगल साम्राज्याच्या काळानंतर गेल्या चार दशकांत समाजातील या तिरस्कृत घटकास हे धार्मिक विधी काशीसारख्या कर्मठ तीर्थक्षेत्री प्रथमच करू दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने तृतियपंथींना स्वतंत्र ओळख दिल्याने ते अधिक उजळ माथ्याने जगू लागले आहेत व समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे, याचे हे स्वागतार्ह द्योतक मानले जात आहे.सध्या सुरु असलेल्या पितृपक्षात लाखो श्रद्धाळू हिंदू विविध तीर्थक्षेत्रांवर आणि पवित्र संगमांवर जाऊन आपल्या पितरांचे तर्पण करीत आहेत. यानुसार शेकडो तृतीयपंथींनी त्यांच्या धार्मिकगुरु महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ मंदिरात आणि माँ अन्नपूर्णा मंदिरात दुग्धाभिषेक व षोडषोपचार पूजा केली. या तृतियपंथी भक्तांनी बाबा विश्वनाथाच्या पिंडीवर ११ लिटर दुधाचा अभिषेक केला व त्यानंतर त्यांना रीतीनुसार ‘मांग वस्त्र’ (सुवासिनीचे वाण) व प्रसाद देण्यात आला, असे विश्वनाथ मंदिराचे पुजारी आचार्य श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. यानंतर या तृतियपंथींनी माँ अन्नपूर्णेच्या दरबारात जाऊन ‘कुकुंमार्जन’ केले व सर्वाच्या सुख, समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली.यानंतर या समुहाने गंगेच्या काठी जाऊन आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी, यासाठी विधिवत श्राद्धकर्म केले. इतरांप्रमाणे आमच्याही श्रद्धा आणि भाव-भावना असतात. इतरांप्रमाणे आम्हालाही आपल्या पूर्वजांच्या ऋणातून श्राद्धविधीने उतराई व्हावे, असे मनापासून वाटते. परंतु इतकी वर्षे आम्हाला बहिष्कृताची वागणूक देऊन पंडित व पुजारी मंदिरातही येऊ देत नसत. आता आम्ही पुजाऱ्यांचे मन वळविले व तेही तयार झाले. म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने एकदमच येथे आलो, अशी भावना एका तृतियपंथीने सर्वांच्या वतीने व्यक्त केली.शेकडो वर्षांनी आम्हाला काशीत उजळ माथ्याने, कोणताही भेदभाव आणि तिरस्कार न करता पूजा व श्राद्धविधी करू दिले गेले याचा त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. एक वयोवद्ध तृतियपंथी म्हणाली की, असे बहुधा दुसऱ्यांदा घडले. याआधी मुगलांच्या साम्राज्यात असे घडले होते,असे आमच्या कित्येक पिढ्यांना लहानपणापासून सांगण्यात येत असे.