शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

EVM मध्ये छेडछाड करून दाखवाच! निवडणूक आयोगाचे आव्हान

By admin | Updated: April 12, 2017 20:48 IST

मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवाच, असे थेट आव्हान निवडणूक आयोगाने EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करणाऱ्यांना दिले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून EVMवर घेण्यात येत असलेल्या शंका, होत असलेली आरोपबाजी, मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची झालेली मागणी,  त्यामुळे एकंदरीत निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेले संशयाचे वातावरण,  या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवाच, असे थेट आव्हान निवडणूक आयोगाने EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करणाऱ्यांना  दिले आहे. त्यासाठी आरोपकर्ते, शास्त्रज्ञ आणि मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानातील जाणकारांना निवडणूक आयोगाने मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून 10 मेपर्यंतचा अवधी दिला आहॆ. 
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 13 विरोधी पक्षांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी मतदान यंत्रात होत असलेल्या छेडछाडीचा मुद्दाही उपस्थित केला. राष्ट्रपतींची भेट घेऊन आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मतदान यंत्रातील छेडछाडीच्या आरोपांमुळे मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा आरोप केला होता. आज राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये  सोनिया गांधी,  राहुल गांधी, गुलाम नबी आझागद आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश होता. 
दरम्यान, सातत्याने होणाऱ्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. त्यानुसा मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्ये तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानाचे जाणकार आणि राजकारणी निवडणूक आयोगाकडे येऊन मतदान यंत्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतील. याआधी 2009 मध्येही मतदान यंत्रांवर शंका घेण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने अशाच प्रकारचे आव्हान दिले होते. पण त्यावेळी कुणीही मतदान यंत्रात छेडछाड करू शकला नव्हता.  
काही दिवसांपूर्वी  मतदान यंत्रांमध्ये फेरफार होणे शक्य आहे. जर मतदान यंत्रे सार्वजनिक झाली तर त्यात होणारी फेरफार 72 तासांत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी  निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानेही केजरीवाल यांना मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याचे प्रतिआव्हान दिले होते. केजरीवाल यांच्या प्रमाणेच काँग्रेस, बसपा आणि अन्य पक्षांनीही मतदान यंत्राबाबत शंका उपस्थित केल्या होत्या.