शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शोपिआन गोळीबार प्रकरण- लष्करी जवानांनी दगडफेक करणा-यांविरोधात केलं काऊंटर एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:55 IST

जम्मू-काश्मीरमधल्या शोपियाँमध्ये लष्कराच्या गोळीबारात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. परंतु या प्रकरणानं आता नवे वळण घेतलं आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या शोपिआनमध्ये लष्करी जवानांच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या प्रकरणानं आता नवे वळण घेतलं आहे. या प्रकरणात एकीकडे 10 रायफल्सच्या जवानांना जम्मू-काश्मीरमधील पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपी बनवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे लष्करानंही दगडफेक करणा-या तरुणांविरोधात काऊंटर एफआयआर नोंदवलं आहे.लष्कराकडून शोपिआन जिल्ह्यातील गोळीबाराच्या वेळी दगडफेक करणा-या लोकांविरोधात काऊंटर एफआयआर दाखल करण्यात आलंय. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केलं होतं. ज्यात लष्कराच्या टीमचं नेतृत्व करणारे 10 रायफल्सच्या सैनिकांना आरोपी बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी जवानांविरोधात हत्या(302) आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी(307) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लष्करही जवानांच्या बाजूनं उभं राहिलं आहे. आमची या प्रकरणातील भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणीही आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर गोगोई म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी ईदच्या दिवशीच सुरक्षा जवानांवर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली होती. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात तरुण जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांसह पोलिसांवर दगडफेक केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी नळकांड्याही फोडल्या होत्या. काश्मीरमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी दिली नव्हती. ईदच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याच्या भीतीपायी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. पोलिसांचा जमावबंदी आदेश झुगारून ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. त्यानंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्याच वेळी अनंतनागमध्येही दगडफेक करणारे तरुण आणि सुरक्षा दलाचे जवानांमध्ये वाद झाला होता. दिवसेंदिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. काश्मीरमध्ये अशांतता कायम राहावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असतो. पाकिस्तानला यात फुटीरतावादी नेत्यांची मदत मिळते. फुटीरतावादी नेतेच तरुणांना लष्करावर दगडफेक करण्यासाठी उद्युक्त करत असतात. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या आहे. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.