शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

दुकानदाराने पाण्याच्या बॉटलसाठी घेतले जास्त पैसे, कोर्टाने ठोठावला 12 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 18:06 IST

थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

बंगळुरू - थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.  बंगळुरूच्या ग्राहक मंचाकडे असंच एक प्रकरण आलं आहे. राघवेंद्र केपी नावाच्या एका व्यक्तीला एका लिटरच्या एका पाण्याच्या बॉटलसाठी 21 रूपये जास्त द्यावे लागले होते.  या फसवणुकीविरोधात राघवेंद्र यांनी किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोला, विक्रेता आणि रॉयल मीनाक्षी मॉल   आदींविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राघवेंद्र यांना 5 डिसेंबर 2015 रोजी दुकानदाराने 1 लिटर पाण्याची बॉटल 40 रूपयांना दिली होती. पण त्या बॉटलवर 19 रूपये इतकी किंमत होती. त्यानंतर जयानगर येथील एका दुकानातून त्यांनी तीच पाण्याची बॉटल 19 रूपयांना विकत घेतली. या दोन्ही ठिकाणची चलन पावती राघवेंद्र यांनी ग्राहक न्यायालयात जमा केली आणि रॉयल मीनाक्षी मॉलमध्ये विकत घेतलेल्या बॉटलमुळे 21 रूपयांचं नुकसान झालं, त्यांनी फसवणूक केली अशी तक्रार केली. किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोलानेही दुकानदाराने फसवणूक केल्याचं मान्य केलं. 2016 च्या सुरूवातीपासून या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती. न्यायालयात सुनावणीच्या वेळी दुकानदाराने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत तक्रारकर्ता राघवेंद्र खोटं बोलत असल्याचं म्हटलं. पण न्यायालयाने राघवेंद्र यांचा आरोप खरा अशून त्यांच्याकडून 21 रूपये जास्त आकारण्यात आल्याचं म्हटलं. परिणामी कोर्टाने दुकानदाराला12 हजार रूपये दंड ठोठावला आणि तक्रारकर्त्या राघवेंद्र यांना ते पैसे देण्यास सांगितलं. बंगळुरूच्या घ्राहक न्यायालयात आलेला हा निर्णय ग्राहकांच्या होणा-या फसवणुकीला आळा बसवण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. 

ग्राहकांचा आवाज-पाण्याची बाटली, शीतपेय असे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकण्याचा प्रघात गेली अनेक वर्षे राजरोसपणे सुरू आहे. देशभरातील काही सजग ग्राहकांनी वेळोवेळी, ठिकठिकाणी तक्रारी केल्या आहेत. काही केसेसमध्ये अशा तक्रारी जिल्हा आणि राज्य पातळीवरील ग्राहक मंचानी फेटाळल्या आहेत. पण अखेर काही ग्राहकांनी जिद्दीनं राष्ट्रीय ग्राहक मंचापर्यंत जाऊन दाद मागितली आहे. आणि त्यातून काही केसेसमध्ये ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागला आहे.उदाहरणार्थ, दिल्लीचे सचिन धिमन आणि शरण्य यांची ही केस. या दोघांनी भारतीय रेल्वेनं प्रवास करताना आयआरसीटीसी अर्थात रेल्वेला खानपान सेवा पुरवणा-या कंपनीकडून घेतलेली शीतपेयाची बाटली त्यांना 15 रु पयांना पडली, ज्याची एमआरपी फक्त १२ रुपये होती. तीन रुपयांसाठी कशाला लढायचं, असा विचार न करता हे दोघे लढले. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला. सचिन धिमन आणि शरण्य यांना न्याय मिळाला. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं दिलेल्या निकालात म्हटलं की, ‘सचिन धिमन आणि शरण्य यांना आयआरसीटीसीनं अन्यायाची नुकसानभरपाई आणि केस लढवण्याचा खर्च आणि त्रास यांचा मोबदला म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे तसेच आयआरसीटीसीने दंड म्हणून देशाच्या ग्राहक कल्याण निधीसाठी दहा लाख रुपये द्यावे. तक्र ार करायला हे दोघेच पुढे सरसावले; पण आयआरसीटीसीनं अनेक ग्राहकांना या प्रकारे लुबाडले असणार, म्हणून इतका दंड !’ अशा आणखीही काही केसेसमध्ये ग्राहकांना लुबाडण्याच्या विरोधात ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागले आहेत.

कशी करायची तक्रार -

महाराष्ट्रभर कुठेही ओव्हरचार्जिंग होत असल्याचं आढळल्यास ०२२-२२८८६६६६ या क्र मांकावर तक्रार नोंदवता येईल. किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmkonkan@yahoo.in इथं इमेलही करता येईल.