शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 05:54 IST

निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह निमलष्करी दलातील ५५ हजार ५५५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफलचे ५५ हजार ५५५ जवान सेवेतून मुक्त झाले आहेत. यातील ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे, तर ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ७,६८४ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजीनामे दिले आहेत. २०२१ मध्ये १२,०१३ आणि २०२२ मध्ये १२,३७१ जवान सेवेतून मुक्त झालेत. मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक नोकरी सोडण्याच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. या वर्षी १२,३०२ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

किती जवानांनी केल्या आत्महत्या?निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRajya Sabhaराज्यसभा