शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विमा रकमेसाठी स्वत:च्याच खुनाची दिली सुपारी; राजस्थानातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:33 IST

: पोलीस तपासातून धक्कादायक माहिती उघड; निर्जनस्थळी मिळाला मृतदेह

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या नावे काढलेल्या विम्याची रक्कम कुटुंबियांस मिळावी यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन गेल्या आठवड्यात स्वत:चाच खून करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासातून उघड झाला आहे.

या मुलखावेगळ्या इसमाचे नाव बलबीर असून, त्याचा मृतदेह भिलवाडा जिल्ह्यातील मांगरोप गावात एका निर्जन ठिकाणी मिळाला. त्याचे हात-पाय दोरीने बांधलेले होते व गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी बलबीरच्या खुनाच्या आरोपावरून सुनील यादव आणि राजवीर या दोन आरोपींना अटक केली. हे दोघेही उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्या जबानीतून बलबीरने स्वत:च सुपारी देऊन आपला खून करून घेतला, असे उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बलबीरच्या कुटुंबियांनी मात्र खुनाची सुपारी दिली जाणे किंवा बलबीरने उतरविलेला विमा याचा इन्कार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बलबीरने आपला खून करण्यासाठी ८० हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर आपला खून कसा व कुठे केला जावा हेही त्यानेच ठरविले व तोच त्याठिकाणी घेऊन गेला, असे आरोपींनी जबानीत सांगितले.

आरोपींच्या या म्हणण्यात कितपत विश्वास ठेवावा हे तपासण्यासाठी पोलिसांनी गावात चौकशी केली असता असे कळले की, बलबीरने गेल्या वर्षभरात लोकांकडून २० लाख रुपये उसने घेऊन ती रक्कम इतरांना चढ्या व्याजाने कर्जाऊ दिली होती; पण या व्यवहारांतून गेल्या सहा महिन्यांत त्याला काहीच कमाई झाली नाही. पैसे उसने दिलेले लोक बलबीरकडे तगादा लावू लागले व त्याने ज्यांना पैसे व्याजाने दिले होते ते परतफेड करण्याचे टाळू लागले. 

८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविलापोलिसांच्या म्हणण्यानुसार या दुहेरी कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या रकमेचा विमा उतरवून आयुष्य संपविण्याची भन्नाट योजना त्याच्या डोक्यात शिजली. त्यानुसार त्याने ८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला; पण आत्महत्या केली तर विम्याची रक्कम मिळणार नाही, असे त्याला जाणकारांनी सांगितले. म्हणून त्याने मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन त्यांच्याकरवी आपला खून करून घेण्याची शक्कल लढविली. यामुळे ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले त्यांचा तगादाही संपेल व आपण नसलो तरी विम्याची रक्कम मिळून कुटुंबाचा चरितार्थ आरामात चालू शकेल, अशी यामागची त्याची कल्पना असावी.