शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची गेली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:30 IST

प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) : अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची दृष्टी गेल्याची घटना येथे घडली. राज्य सरकारने कठोर कारवाई करीत रुग्णालयाचा परवाना रद्द केला असून आॅपरेशन थिएटर सील केले आहे.दृष्टी गमवावी लागलेल्या रुग्णांवर टी. थोईथराम रुग्णालयात सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत. पीडित रुग्णांना जिल्हा प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. २0१0 मध्येही याच रुग्णालयात १८ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली होती.८ आॅगस्ट रोजी इंदौर आय हॉस्पिटलमध्ये अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या डोळ््यात औषध टाकण्यात आले. त्यातून संसर्ग होऊन रुग्णांची दृष्टी गेली. तेथील डॉक्टरांनी दहा दिवसांपर्यंत रुग्णांवर उपचार गेले. तथापि, त्यांची दृष्टी परत आली नाही.राज्याच्या आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांनी सात सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, सीएमएचओ आणि दोन नेत्रतज्ञ यांचा समावेश आहे.२0१0 मध्ये या रुग्णालयात १८ लोकांना दृष्टी गमवावी लागली होती. तत्कालिन सीएमएचओ डॉ. शरद पंडित यांनी हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची शिफारस केली होती. २0११ मध्ये रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व शिबिरांवर बंदी घालण्यात आली होती. शिबिराच्या आयोजनासाठी सीएमएचओच्या अनुमतीचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र हे प्रतिबंध थोडे दिवसच लागू राहिले. नंतर हे आदेश शिथील झाले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश