शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कातंत्र अन् राजकीय मास्टरस्ट्राेक! केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडणे ठरू शकते दुधारी तलवार; नव्या नेतृत्वाचा उदय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 08:09 IST

शिवाय राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी ही दुधारी तलवारही ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.  यामुळे दिल्लीच्या राजकारणात वादळ निर्माण हे नक्की झाले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाेन दिवसांनंतर राजीनामा देण्याची घाेषणा करून दिलेला धक्का म्हणजे एक राजकीय मास्टरस्ट्राेक मानला जात आहे.

कथित अबकारी घोटाळाप्रकरणी तुरुंगात असताना केवळ लोकशाहीच्या लढ्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या राज्यघटनेसाठी तेव्हा राजीनामा दिला नव्हता, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांची ही घोषणा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेला भावनिक साद घालण्यासाठी खेळलेली राजकीय चाल मानली जाते. शिवाय राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी ही दुधारी तलवारही ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.  यामुळे दिल्लीच्या राजकारणात वादळ निर्माण हे नक्की झाले आहे.

लवकर निवडणुका ठरू शकते जोखीम

मुदतपूर्व निवडणुका घेणे ही ‘आप’साठी जोखीम ठरू शकते. कारण, गेल्या काही महिन्यांत ‘आप’च्या अनेक नेत्यांपैकी काही नेते कायदेशीर अडचणीत अडकले आहेत, तर काही तुरुंगात.

nया काळात विरोधी पक्षांनी नागरी समस्यांवरून सातत्याने ‘आप’ला घेरले आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचे ठरलेच, तर सत्ताधारी ‘आप’ला या सर्वातून सावरण्यासाठी फार कमी कालावधी मिळणार आहे.

काय आहे योजना?

जामीन मिळाल्यानंतर राजीनामा देऊन जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याचा आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल यांच्यासह इतर नेत्यांचा मानस स्पष्ट होत आहे.

मात्र, त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहण्यापेक्षा भावनिक लाटेवर स्वार होत निवडणुकीत लाभ मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.

केजरीवाल यांच्यासह त्यांचे सहकारी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पण अबकारी घोटाळा प्रकरणात सध्या जामिनावर आहेत. दोघेही आता घरोघरी जाऊन प्रचार करताना भाजपने हुकूमशाही चालवली असल्याचे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील.

जेवढा आत्मविश्वास, तेवढेच धोके?

जनतेच्या आदेशानंतरच पुन्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची घोषणा केजरीवाल-सिसोदिया यांनी केल्याने आता विधानसभा निवडणुकीपर्यंत या दोघांऐवजी नवीन चेहऱ्यांची निवड करावी लागेल.

मात्र, आजवरच्या इतिहासात काही महिन्यांसाठी तात्पुरता मुख्यमंत्री निवडणे अनेकांना महागात पडल्याचे दाखले आहेत. कारण, अशा निवडीने नवीन सत्तास्पर्धा निर्माण होऊन मुख्य नेत्यांना पडद्याआड जावे लागले आहे.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी चंपई सोरेन यांच्या नावाची शिफारस केली होती. पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यात सोरेन यांना अडचणी आल्या होत्या.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप