शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी नगर पुलावरून आता फक्त दुचाकींनाच प्रवेश

By admin | Updated: November 7, 2015 00:03 IST

जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.

जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.
या बैठकीत विभाग नियंत्रक आर.वाय.साळवे, विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, वाहतूक निरिक्षक आर.डी.साबळे उपस्थित होते.
याआदेशामुळे रा.प.संघटनांच्या लढाईला यश आल्याने समाधान व्यक्त होत असले तरीही ७ रोजी सकाळी ९ वाजता संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून मोर्चाबाबत विचारविमर्ष होणार असल्याचे समितीचे समन्वयक गोपाळ पाटील यांनी सांगितले.
शिवाजी नगर उड्डाण पुल धोकेदायक घोषित करून अवजड वाहतूकीस २६ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आली होती. तरीही पुलावरुन अवजड वाहन, वाळु, खडी, मुरूम घेऊन अवैध वाहतूक सुरु होती. यामुळे मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता होती. तसेच रा.प.च्या चोपडा,यावलकडे जाणार्‍या बसेस गुजराल पेट्रोलपंपकडून ७ किमीच्या जास्तीच्या अंतराने वळविल्याने ६० ते ७० गावांच्या प्रवाशांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूकीला वाव मिळून रा.प.महामंडळाच्या महसूलात मोठी घट होत होती. याविरोधात रा.प.च्या सर्व संघटनांनी मनपा विरोधात ७ रोजी बसेससह मोर्चाचे नियोजन केले होते. त्याअनुशंघाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन केेले. बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.