शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

शिवाजी नगर पुलावरून आता फक्त दुचाकींनाच प्रवेश

By admin | Updated: November 7, 2015 00:03 IST

जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.

जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.
या बैठकीत विभाग नियंत्रक आर.वाय.साळवे, विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, वाहतूक निरिक्षक आर.डी.साबळे उपस्थित होते.
याआदेशामुळे रा.प.संघटनांच्या लढाईला यश आल्याने समाधान व्यक्त होत असले तरीही ७ रोजी सकाळी ९ वाजता संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून मोर्चाबाबत विचारविमर्ष होणार असल्याचे समितीचे समन्वयक गोपाळ पाटील यांनी सांगितले.
शिवाजी नगर उड्डाण पुल धोकेदायक घोषित करून अवजड वाहतूकीस २६ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आली होती. तरीही पुलावरुन अवजड वाहन, वाळु, खडी, मुरूम घेऊन अवैध वाहतूक सुरु होती. यामुळे मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता होती. तसेच रा.प.च्या चोपडा,यावलकडे जाणार्‍या बसेस गुजराल पेट्रोलपंपकडून ७ किमीच्या जास्तीच्या अंतराने वळविल्याने ६० ते ७० गावांच्या प्रवाशांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूकीला वाव मिळून रा.प.महामंडळाच्या महसूलात मोठी घट होत होती. याविरोधात रा.प.च्या सर्व संघटनांनी मनपा विरोधात ७ रोजी बसेससह मोर्चाचे नियोजन केले होते. त्याअनुशंघाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन केेले. बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.