शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

शशिकलांचं राजकीय भवितव्य अंधारात

By admin | Updated: February 14, 2017 11:22 IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 -  बेहिशेबी संपत्तीप्रकरणी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे तामिळनाडूतील राजकारणात उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने शशिकला यांच्याविरोधात निकाल दिल्यानं त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात असल्याचे दिसत आहे. कारण पुढील 6 वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली आहे, शिवाय पुढील 10 वर्षे मुख्यमंत्रीपदापासूनही त्यांना दूर राहावं लागणार आहे. 
 
21 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह शशिकला आणि अन्य दोन साथीदारांना बंगळुरुच्या विशेष कोर्टाने 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 2015 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने चौघांचीही सुटका केली होती.
 
नेमके काय आहे प्रकरण?
जयललिता यांच्यावर 1991 ते 1996 या काळात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. 1996 मध्ये बेहिशेबी संपत्तीचा खटला दाखल करण्यात आला होता.  यावेळी जयललिता यांनी तत्कालीन उत्पन्नापेक्षा 66 कोटी अधिक बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. जयललिता यांच्यासोबत दत्तकपुत्र सुधाकरन, शशिकला आणि शशिकला यांची भाची इल्वारासी यांनाही आरोपी करण्यात आले.
(शशिकलांचं स्वप्न भंगलं, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी)
 
यादरम्यान जयललितांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी  880 किलो चांदी, 28 किलो सोने, 10 हजार 500 साड्या, 750 चपलांचे जोड, 91 घड्याळं आणि अन्य महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.  2002 मध्ये जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण कर्नाटक कोर्टाकडे सोपवले.
 
बंगळुरुच्या विशेष कोर्टाने 27 सप्टेंबर 2014 रोजी या प्रकरणी निकाल दिला. यावेळी  जयललिता यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, सोबत 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शशिकला, इल्वारासी आणि सुधाकरन यांनाही 4 वर्षांची शिक्षा व प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  
 
यानंतर 11 मे 2015 रोजी कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणात  सबळ पुरावे नसल्याचे  सांगत चौघांचीही सुटका केली. जयललिता तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा भार पन्नीरसेल्वम सांभाळत होते. मात्र अम्मांची सुटका होताच, पन्नीरसेल्वम यांनी तात्काळ राजीनामा दिला. जयललिता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तामिळनाडूच्या सीएम झाल्या.