शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 05:43 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या यशावर पुढील पावले टाकणार

असिफ कुरणे

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातून माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. शशिकला यांनी निवृत्तीची घोषणा करून अनेकांना धक्का दिला. सत्ताधारी अण्णाद्रमुक आघाडीसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी शशिकला यांचा हा निर्णय एक धोरणात्मक चाल असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. जयललिता यांच्या पश्चात होणाऱ्या या दुसऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत त्यांना किती यश मिळते, यावर शशिकला यांची पुढील चाल अवलंबून असणार आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांच्या शिक्षेनंतर शशिकला यांचे ज्याप्रकारे तामिळनाडूमध्ये स्वागत झाले त्यानुसार विधानसभा निवडणुकीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, गेल्या बुधवारी त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत आपली माघार जाहीर केली. पण त्याचवेळी त्यांनी आपला मुख्य विरोधी द्रमुकला पराभूत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेने अण्णाद्रमुकला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण शशिकला पुतण्या टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके पक्षाचा प्रचार करतील, असा कयास होता. दिनकरन यांच्या एएमएमकेने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास २२ लाख मते मिळवत (४ टक्के) आपले महत्त्व दाखवून दिले आहे. दिनकरन विधानसभेच्या माध्यमातून यात आणखी भर घालू इच्छितात. अण्णाद्रमुक पक्षात शशिकला यांना मानणारा  मोठा गट आजही कार्यरत असून, तो त्यांच्यासोबत जाण्याचा धोका होता. पण त्यांनी आता घेतलेल्या माघारीमुळे एएमएमके सत्ताधारी आघाडीत सामील होण्याची चिन्हे आहेत. शशिकला यांनी माघार घेत एकाचवेळी दोन-तीन लक्ष्य समोर ठेवल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत थेट सहभागी होत नसल्यामुळे केंद्र, राज्य सरकारच्या तपास यंत्रणाचा इतर प्रकरणातील ससेमिरा थांबेल.

निकालानंतर अण्णाद्रमुकमधील पलानीस्वामी, पनीरसेल्वम यांची ताकद कळेल. तसेच अण्णाद्रमुक समर्थकांमध्ये जयललिता यांच्यानंतर योग्य नेतृत्व म्हणून शशिकला यांचे नाव पुढे येईल, असा अंदाज आहे. पनीरसेल्वम, पलानस्वामी हे सत्तेतून बाहेर जाणे हेच शशिकला यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच एवढ्या घाईगडबडीत मोठी निवडणूक लढवून धोका पत्करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहण्याचा मार्ग शशिकला यांनी निवडला आहे. त्यांनी राजकारणातून नाही तर विधानसभा निवडणुकीतून तात्पुरती माघार घेतली आहे. निवडणूक निकालानंतर त्या आपली चाल पुन्हा खेळतील आणि अण्णाद्रमुक पक्षात पूर्वीसारखे स्थान निर्माण करतील, असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे.

पराभवाचे खापर फुटण्याचा धोकाशशिकला यांनी आता अण्णाद्रमुक आघाडीसोबत सक्रिय सहभाग दाखवला असता तर यशा-अपयशाच्या मानकरी त्याच ठरल्या असत्या. लोकसभेचा निकाल आणि तामिळनाडूमधील सध्याचे वातावरण पाहता अण्णाद्रमुक आघाडी पुन्हा सत्तेत येईल, याची शक्यता कमी दिसते. निवडणूक चाचण्यांनीदेखील द्रमुकच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये, याची काळजी शशिकला यांनी घेतली आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१