शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले; शशी थरुर यांनी केले कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:42 IST

Shashi Tharoor news: पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली.

Shashi Tharoor S Jaishankar: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानला फटकारणाऱ्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याचे समर्थनही केले. थरूर म्हणाले, प्रत्येकजण पाकिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जयशंकर यांचे वक्तव्य पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची आपल्याला काळजी असल्याचे द्योतक आहे. यात एक अडचण अशी आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणतीही खरी चर्चा सुरू नाही. अन्यथा आम्ही थेट आमच्या समस्या मांडून योग्य कारवाईची मागणी करू शकलो असतो.

शशी थरुर पुढे म्हणाले, परराष्ट्र मंत्र्याचे विधान पूर्णपणे तथ्यात्मक होते. पाकिस्तानात अतिशय विदारक परिस्थिती आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. संसदेत जयशंकर यांच्या विधानानंतर थरुर यांची टिप्पणी आली, ज्यात ते म्हणाले - पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. 

यावेळी जयशंकर यांनी सभागृहात सांगितले की, पाकिस्तानमध्ये शीख समुदायाशी संबंधित तीन घटना घडल्या. एका प्रकरणात शीख कुटुंबावर हल्ला झाला होता. दुसऱ्या घटनेत शीख कुटुंबाला जुना गुरुद्वारा पुन्हा उघडण्यासाठी धमकावण्यात आले. तर, शीख समुदायातील मुलीचे अपहरण करून धर्मांतराचे प्रकरणही समोर आले आहे. यासोबतच अहमदिया समुदायाशी संबंधित दोन प्रकरणे समोर आली होती. एका प्रकरणात, त्यांची मशीद सील करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात 40 कबरींची तोडफोड करण्यात आली. याशिवाय, ख्रिश्चन समुदायाशी संबंधित एक प्रकरण आहे. कथितरित्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका ख्रिश्चन व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता.

ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तानच्या अहवालात काय?तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तान (HRFP) च्या अहवालात 2025 च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या संख्येत तीव्र वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. एचआरएफपीचे प्रमुख नावेद वॉल्टर म्हणाले, पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत, त्यांना मारले जात आहे. त्यांना ईशनिंदेच्या आरोपात गोवले जात आहे. याशिवाय अपहरण, बळजबरीने धर्मांतर, बळजबरीने विवाह करण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुस्लिमेतरांचे दुःख समजून घेणारे कोणीच नाही. त्यांच्या दुर्लक्षाकडे लक्ष न देणे हे अधिक क्लेशदायक आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान