शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

CAA Protest : शशी थरूरांनी केजरीवालांसाठी वापरला 'किन्नर' शब्द अन् मागितली माफी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 16:25 IST

CAA Protest : शशी थरूर एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी किन्नर (Eunuch) शब्द वापरला आहे. अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता पाहिजे. किन्नर असे अनेक वर्षांपासून करत आहेत, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यानंतर शशी थरूर यांनी याबाबत माफीही मागितली आहे. 

शशी थरूर एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेबद्दल शशी थरूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "अरविंद केजरीवाल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे आपल्या बाजूला करू पाहत आहेत. आम आदमी पार्टीचे नेता दोन्ही बाजूने फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अरविंद केजरीवाल केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. मात्र, याविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेत नाही."

याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून असा किन्नरांना विशेष अधिकार आहे. असा अप्रभावी दृष्टीकोन मुख्यमंत्री म्हणून त्यांची जागा सुरक्षित ठेवेल, असेही शशी थरूर म्हणाले. दरम्यान, शशी थरुर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्याअसलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

महत्त्वाच्या बातम्या 

Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरArvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक