शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 11:19 IST

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली.

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तब्बल ७० वर्षांनंतर देशाची राजधानी दिल्लीत होणारे ९८ वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानाच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल, अशी मला आशा असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी ‘सरहद’ या संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी डॉ. शैलेश पगारिया, अतुल बोकरिया, प्रदीप पाटील आणि लेशपाल जवळगे उपस्थित होते. ‘सरहद’ने अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत केले आहे. संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केले. पंतप्रधानांशी चर्चा होऊ शकली नाही. मात्र, उद्घाटन करणार याचे स्वीकृतीपत्र द्यावे, असे पंतप्रधानांच्या सचिवांसोबत बोलणे झाले, तर ७० वर्षांनंतर दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना केली.

पाच हजार लोकांची उपस्थिती

पवार यांनी आसन, निवास आणि भोजन व्यवस्था, व्हीआयपी गेट आदी गोष्टींच्या मुद्यावर आयोजकांशी विस्तृत चर्चा केली. साहित्य संमेलनाला जवळपास पाच हजार लोकांची उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तालकटोरा स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दुसऱ्या सभागृहाला अण्णाभाऊ साठे, मुख्य प्रवेश द्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, व्यासपीठाला काकासाहेब गाडगीळ, दुसऱ्या प्रवेश द्वाराला यशवंतराव चव्हाण नाव देण्यात आले आहे. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस