शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शंकरसिंह वाघेला भाजपाच्या वाटेवर? राहुल गांधींना ट्विटर केले "अनफॉलो"

By admin | Updated: May 15, 2017 16:21 IST

गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. 
 
प्रदेश काँग्रेसनं आयटी सेलच्या परिषदेचं आयोजन केले होते.  या परिषदेत वाघेला सहभागी झाले नाहीत. विशेष बाब म्हणजे ऐन परिषदेच्याच वेळी वाघेला यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींसहीत अन्य नेत्यांना "अनफॉलो" करण्याचं पाऊल उचललं आहे. 
दरम्यान या परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी सहभागी झाले होते. त्यांचे सोशल मीडिया सांभाळणा-या पार्थेश पटेल यांनी सांगितले की, वाघेल यांनी मला सांगितले की, "सोशल मीडियाचा वापर करणं बंद केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर 30 ट्विटर हँडलना अनफॉलो करण्यात आले". 
 
गेल्या आठवड्यात वडोदरा शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर वाघेला यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सांगण्यात आल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. या पोस्टरद्वारे वाघेला भाजपा प्रवेश करणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पद उमेदवारांच्या शर्यतीत सहभागी होणार नसल्याचे वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. 
 
तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर वाघेला यांना पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवावं, अशी मागणी काँग्रेस पार्टीतील 57 पैकी 36 आमदारांनी केली होती. 
 
"निवडणूक लढवणं महत्त्वपूर्ण नाही"
गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी असे सांगितले की, यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. 
विधानसभा निवडणुकीत अशी कोणती पसंतीची कोणती जागा आहे जेथून निवडणूक लढवण्यास आवडेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वाघेला म्हणाले की,  आयुष्यात आपण ब-याच निवडणुका लढल्या आहेत आणि आता निवडणूक लढवणं इतकं महत्त्वाचं नाही. आता गुजरातमधील लोकं ज्या समस्यांचा सामना करत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लढण्याची आता वेळ आहे. माझ्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढणं महत्त्वपूर्ण बाब नाही"
तसंच भाजपा प्रवेशच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.