शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शंकरसिंह वाघेला भाजपाच्या वाटेवर? राहुल गांधींना ट्विटर केले "अनफॉलो"

By admin | Updated: May 15, 2017 16:21 IST

गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. 
 
प्रदेश काँग्रेसनं आयटी सेलच्या परिषदेचं आयोजन केले होते.  या परिषदेत वाघेला सहभागी झाले नाहीत. विशेष बाब म्हणजे ऐन परिषदेच्याच वेळी वाघेला यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींसहीत अन्य नेत्यांना "अनफॉलो" करण्याचं पाऊल उचललं आहे. 
दरम्यान या परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी सहभागी झाले होते. त्यांचे सोशल मीडिया सांभाळणा-या पार्थेश पटेल यांनी सांगितले की, वाघेल यांनी मला सांगितले की, "सोशल मीडियाचा वापर करणं बंद केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर 30 ट्विटर हँडलना अनफॉलो करण्यात आले". 
 
गेल्या आठवड्यात वडोदरा शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर वाघेला यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सांगण्यात आल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. या पोस्टरद्वारे वाघेला भाजपा प्रवेश करणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पद उमेदवारांच्या शर्यतीत सहभागी होणार नसल्याचे वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. 
 
तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर वाघेला यांना पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवावं, अशी मागणी काँग्रेस पार्टीतील 57 पैकी 36 आमदारांनी केली होती. 
 
"निवडणूक लढवणं महत्त्वपूर्ण नाही"
गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी असे सांगितले की, यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. 
विधानसभा निवडणुकीत अशी कोणती पसंतीची कोणती जागा आहे जेथून निवडणूक लढवण्यास आवडेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वाघेला म्हणाले की,  आयुष्यात आपण ब-याच निवडणुका लढल्या आहेत आणि आता निवडणूक लढवणं इतकं महत्त्वाचं नाही. आता गुजरातमधील लोकं ज्या समस्यांचा सामना करत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लढण्याची आता वेळ आहे. माझ्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढणं महत्त्वपूर्ण बाब नाही"
तसंच भाजपा प्रवेशच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.