शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शंकरसिंह वाघेला भाजपाच्या वाटेवर? राहुल गांधींना ट्विटर केले "अनफॉलो"

By admin | Updated: May 15, 2017 16:21 IST

गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. 
 
प्रदेश काँग्रेसनं आयटी सेलच्या परिषदेचं आयोजन केले होते.  या परिषदेत वाघेला सहभागी झाले नाहीत. विशेष बाब म्हणजे ऐन परिषदेच्याच वेळी वाघेला यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींसहीत अन्य नेत्यांना "अनफॉलो" करण्याचं पाऊल उचललं आहे. 
दरम्यान या परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी सहभागी झाले होते. त्यांचे सोशल मीडिया सांभाळणा-या पार्थेश पटेल यांनी सांगितले की, वाघेल यांनी मला सांगितले की, "सोशल मीडियाचा वापर करणं बंद केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर 30 ट्विटर हँडलना अनफॉलो करण्यात आले". 
 
गेल्या आठवड्यात वडोदरा शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर वाघेला यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सांगण्यात आल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. या पोस्टरद्वारे वाघेला भाजपा प्रवेश करणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पद उमेदवारांच्या शर्यतीत सहभागी होणार नसल्याचे वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. 
 
तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर वाघेला यांना पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवावं, अशी मागणी काँग्रेस पार्टीतील 57 पैकी 36 आमदारांनी केली होती. 
 
"निवडणूक लढवणं महत्त्वपूर्ण नाही"
गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी असे सांगितले की, यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. 
विधानसभा निवडणुकीत अशी कोणती पसंतीची कोणती जागा आहे जेथून निवडणूक लढवण्यास आवडेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वाघेला म्हणाले की,  आयुष्यात आपण ब-याच निवडणुका लढल्या आहेत आणि आता निवडणूक लढवणं इतकं महत्त्वाचं नाही. आता गुजरातमधील लोकं ज्या समस्यांचा सामना करत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लढण्याची आता वेळ आहे. माझ्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढणं महत्त्वपूर्ण बाब नाही"
तसंच भाजपा प्रवेशच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.