शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हृदयविकाराच्या धक्क्याने शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन,राष्ट्रपती व पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:45 IST

कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.

कांचीपूरम (तामिळनाडू) : कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती व पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.गेल्या जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. कांची कामकोटी पीठाचे ते १९९४ मध्ये ६९ वे शंकराचार्य बनले. कांचीपीठाचे पुजारी म्हणून जयेंद्र सरस्वती यांची नियुक्ती झाली त्यावेळी अवघ्या १९ वर्षांचे होते. देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाºया विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते. कांचीपुरममधील वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४ मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी, २००५पर्यंत ते तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३ मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केले.''सरस्वती यांच्या निधनाच्या वृत्ताने मला तीव्र वेदना झाल्या. आपले उदात्त विचार आणि अतुलनीय सेवेमुळे ते लक्षावधी भाविकांच्या हृदयात कायम राहतील. जयेंद्र सरस्वती यांनी गरजू आणि तळागाळातील लोकांची आयुष्ये सुधारण्यासाठी संस्थांची जोपासना केली व समाजाची सेवा करण्यासाठी ते आघाडीवर असायचे.''- नरेंद्र मोदी, पंतप्रधान''मोक्ष प्राप्त केलेले जयेंद्र सरस्वती यांना माझा प्रणाम. मानवतेच्या कल्याणासाठी आणि अध्यात्माच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतील.''- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती''जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर मला दु:ख झाले. शंकराचार्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगभर त्यांना लक्षावधी अनुयायांकडून सन्मान मिळाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो.''- राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष