शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

हृदयविकाराच्या धक्क्याने शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन,राष्ट्रपती व पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:45 IST

कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.

कांचीपूरम (तामिळनाडू) : कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती व पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.गेल्या जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. कांची कामकोटी पीठाचे ते १९९४ मध्ये ६९ वे शंकराचार्य बनले. कांचीपीठाचे पुजारी म्हणून जयेंद्र सरस्वती यांची नियुक्ती झाली त्यावेळी अवघ्या १९ वर्षांचे होते. देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाºया विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते. कांचीपुरममधील वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४ मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी, २००५पर्यंत ते तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३ मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केले.''सरस्वती यांच्या निधनाच्या वृत्ताने मला तीव्र वेदना झाल्या. आपले उदात्त विचार आणि अतुलनीय सेवेमुळे ते लक्षावधी भाविकांच्या हृदयात कायम राहतील. जयेंद्र सरस्वती यांनी गरजू आणि तळागाळातील लोकांची आयुष्ये सुधारण्यासाठी संस्थांची जोपासना केली व समाजाची सेवा करण्यासाठी ते आघाडीवर असायचे.''- नरेंद्र मोदी, पंतप्रधान''मोक्ष प्राप्त केलेले जयेंद्र सरस्वती यांना माझा प्रणाम. मानवतेच्या कल्याणासाठी आणि अध्यात्माच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतील.''- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती''जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर मला दु:ख झाले. शंकराचार्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगभर त्यांना लक्षावधी अनुयायांकडून सन्मान मिळाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो.''- राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष