शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आता मीही रस्त्यावर झाडू मारु का? आमदार आणि मंत्र्यांवर संतापल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 07:48 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या.  लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे २० दिवसांनी झालेल्या बैठकीत त्यांनी महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाणे आणि महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करणे ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा, असे स्पष्ट केले. पुढील वेळी तिकीट देताना अधिक छाननी होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

सीएम बॅनर्जी रिपोर्ट कार्ड पाहताना म्हणाल्या,'आज माझ्यावर बोलण्याची वेळ आहे आणि तुम्ही लोक फक्त ऐकाल.' मंत्री आणि विधाननगरचे आमदार सुजित बोस यांच्यावर कोलकाता येथील राजारहाटमध्ये अतिक्रमणांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यांनी हावडा आमदार आणि मंत्री अरुप रॉय आणि हावडा आमदार गौतम चौधरी यांच्यावर खंडणीचा आरोप केला. सीएम बॅनर्जी यांनी बल्ली नगरपालिकेच्या प्रशासक अमृता रॉय बर्मन यांनाही टोला लगावला.

सीएम बॅनर्जी म्हणाल्या, 'तुम्ही हाथीबागनची स्थिती पाहिली आहे का? मी शहर खूप सुंदर बनवले होते, पण आता नवीन ओसी आला आणि लगेच बेकायदेशीर काम केली. गरियाहाटमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे रस्त्यावर विक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिकचे शेड उभारले आहेत. पोलीस आणि अधिकारी सर्व काही पाहत आहेत, मात्र काहीच करत नाहीत. काही केवळ पैशासाठी काम करत आहेत.

...तर पक्षातून बाहेर काढले जाईल

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतात? आता मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणे, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे, सर्व काही ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा. तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबाबत त्यांनी म्हटले आहे की, जो कोणी खंडणी व चुकीच्या कामात सहभागी असेल त्याला पक्षातून बाहेर काढले जाईल.

कामगिरीच्या जोरावरच भविष्यातील निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाल्या. 'मला खंडणीचा मास्टर नको आहे. मला जनतेचे सेवक हवे आहेत. यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, विजेचा अपव्यय, पार्किंग रॅकेट, खंडणी आदी अनेक मुद्दे मांडले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा, हल्दिया आणि कूपर्स कॅम्पच्या अनेक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 'काही लोकांच्या चुकीच्या कृत्यांमुळे सरकारची प्रतिमा का मलीन व्हावी? जर मला चुकीचे काम होताना दिसत असेल तर तुम्हाला का दिसत नाही? रस्ते अस्वच्छ का आहेत? आता मला रस्त्यावर झाडू घ्यावा लागेल का?, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी