शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

आता मीही रस्त्यावर झाडू मारु का? आमदार आणि मंत्र्यांवर संतापल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 07:48 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या.  लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे २० दिवसांनी झालेल्या बैठकीत त्यांनी महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाणे आणि महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करणे ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा, असे स्पष्ट केले. पुढील वेळी तिकीट देताना अधिक छाननी होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

सीएम बॅनर्जी रिपोर्ट कार्ड पाहताना म्हणाल्या,'आज माझ्यावर बोलण्याची वेळ आहे आणि तुम्ही लोक फक्त ऐकाल.' मंत्री आणि विधाननगरचे आमदार सुजित बोस यांच्यावर कोलकाता येथील राजारहाटमध्ये अतिक्रमणांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यांनी हावडा आमदार आणि मंत्री अरुप रॉय आणि हावडा आमदार गौतम चौधरी यांच्यावर खंडणीचा आरोप केला. सीएम बॅनर्जी यांनी बल्ली नगरपालिकेच्या प्रशासक अमृता रॉय बर्मन यांनाही टोला लगावला.

सीएम बॅनर्जी म्हणाल्या, 'तुम्ही हाथीबागनची स्थिती पाहिली आहे का? मी शहर खूप सुंदर बनवले होते, पण आता नवीन ओसी आला आणि लगेच बेकायदेशीर काम केली. गरियाहाटमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे रस्त्यावर विक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिकचे शेड उभारले आहेत. पोलीस आणि अधिकारी सर्व काही पाहत आहेत, मात्र काहीच करत नाहीत. काही केवळ पैशासाठी काम करत आहेत.

...तर पक्षातून बाहेर काढले जाईल

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतात? आता मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणे, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे, सर्व काही ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा. तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबाबत त्यांनी म्हटले आहे की, जो कोणी खंडणी व चुकीच्या कामात सहभागी असेल त्याला पक्षातून बाहेर काढले जाईल.

कामगिरीच्या जोरावरच भविष्यातील निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाल्या. 'मला खंडणीचा मास्टर नको आहे. मला जनतेचे सेवक हवे आहेत. यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, विजेचा अपव्यय, पार्किंग रॅकेट, खंडणी आदी अनेक मुद्दे मांडले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा, हल्दिया आणि कूपर्स कॅम्पच्या अनेक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 'काही लोकांच्या चुकीच्या कृत्यांमुळे सरकारची प्रतिमा का मलीन व्हावी? जर मला चुकीचे काम होताना दिसत असेल तर तुम्हाला का दिसत नाही? रस्ते अस्वच्छ का आहेत? आता मला रस्त्यावर झाडू घ्यावा लागेल का?, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी