शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शहा यांचा एक लाख कि.मी.चा दौरा

By admin | Updated: May 4, 2017 01:19 IST

आगामी लोकसभा निवडणूक अजून दोन वर्षे दूर असली तरी तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत आणि अधिक देशव्यापी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक अजून दोन वर्षे दूर असली तरी तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत आणि अधिक देशव्यापी करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा आत्तापासूनच कामाला लागले असून, यासाठी ते पुढील सलग पाच महिने देशव्यापी दौरा करणार आहेत.अमित शहा हे केवळ मुरब्बी राजकीय डावपेचकार नाहीत, तर कठोर ‘टास्क मास्टर’ही आहेत. इतरांना कामाला लावण्यासाठी स्वत: अपार कष्ट घेणे ही त्या कार्यपद्धतीची खासियत आहे. यानुसारच त्यांनी हा दौरा हाती घेतला आहे. देशाच्या ज्या भागांत भाजप अजूनही प्रबळ नाही तेथे तो रुजवून वाढवायचा व जेथे प्रबळ आहे तेथे मरगळ झटकून पक्षसंघटना अभेद्य करायची, हा या दौऱ्याचा हेतू आहे.पक्षाच्या सूत्रांनुसार खरे तर शहा यांचा हा दौरा एप्रिलमध्ये त्यांनी जम्मू-काश्मीर व प. बंगालला दिलेल्या भेटीने याआधीच सुरू झाला आहे. दौऱ्यासाठी ठरलेल्या प्राथमिक कार्यक्रमानुसार आज ३ मे रोजी हिमाचल प्रदेशपासून या दौऱ्याचा पुढील टप्पा सुरू होईल व सुमारे पाच महिन्यांनी २५ सप्टेंबर रोजी तेलंगणमध्ये त्याची सांगता होईल.या दौऱ्यात भाजपाध्यक्ष देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांनाच नव्हे, तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप या बेटांनाही भेट देतील. या दौऱ्याच्या कार्यक्रमावर नजर टाकली, तर अमित शहा या पाच महिन्यांत सुमारे एक लाख कि.मी. प्रवास करतील व पाचपैकी तीन महिने ते प्रवासात असतील, असे दिसते. पक्ष सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी १९ एप्रिल रोजी झालेल्या भाजपच्या ‘कोअर ग्रुप’च्या बैठकीत या दौऱ्याची आखणी केली गेली. देशातील राज्यांची ‘ए’ ‘बी’ आणि ‘सी’, अशा तीन गटांत वर्गवारी करून या दौऱ्याची ढोबळमानाने आखणी केली गेली. संबंधित राज्याचा आकार, लोकसंख्या व तेथील लोकसभेच्या जागा यानुसार ही वर्गवारी आहे. ‘ए’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी तीन दिवस, ‘बी’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी दोन दिवस व ‘सी’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी एक दिवस शहा दौरा करतील. बहुतांश केंद्रशासित प्रदेशांत त्यांचा एक दिवसांचा दौरा असेल. सध्या ठरलेल्या ठोबळ कार्यक्रमानुसार या दौऱ्यात अमित शहा १६, १७ व १८ जून, असे तीन दिवस महाराष्ट्रात असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क) दौरा नेमका कशासाठी?प्रचंड बहुमताने सत्तेवर असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने निवडणूक तोंडावर नसताना अशा प्रकारे दौरा काढून संपूर्ण देश पिंजून काढणे या दृष्टीने शहा यांचा हा दौरा नक्कीच ‘न भूतो...’ असा आहे; पण याचा नेमका हेतू काय? मोदींच्या जादूचे गारूड मतदारांच्या मनातून उतरून त्यांचा भ्रमनिरास होत असल्याची चाहूल लागल्याने किंवा तसे होऊ नये यासाठी तर हा दौरा नसावा ना, अशी शक्यताही राजकीय निरीक्षकांना वाटते.